शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

आता मराठी व्याकरण होणार सहज सोपे

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

औरंगाबाद : संस्कृतप्रचूर प्राकृत मराठीचे रूप आता अधिक सहज सोपे होणार असून, शुद्धलेखनाचे नवे नियम लवकरच मूर्तरुपात येणार आहेत.

औरंगाबाद : संस्कृतप्रचूर प्राकृत मराठीचे रूप आता अधिक सहज सोपे होणार असून, शुद्धलेखनाचे नवे नियम लवकरच मूर्तरुपात येणार आहेत. गेली पाच दशके प्रलंबित असलेला हा प्रकल्प येत्या काळात लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.‘माझा मराठाचि बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. बोलताना साधी-सहज वाटणारी मराठी लिहिताना मात्र, अनेकदा किचकट व क्लिष्ट वाटते. ऱ्हस्व, दीर्घ, समास, संधी अशा रुपातील ही जाचक बंधने आता बरीचशी सैल होतील. यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली असून, ही समिती लवकरच आपला मसुदा शासनाला सादर करणार आहे. महामंडळाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीत भाषातज्ज्ञ प्रा. चंद्रकांत मरगज, व्याकरण अभ्यासक अरुण फडके, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, भाषाभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी व शोभा उबगडे यांचा समावेश आहे. व्याकरणाचे हे नवे नियम वापरण्याच्या दृष्टीने सुटसुटीत व लवचीक करण्यावर समितीचा भर असल्याचे सदस्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मराठी मुख्यत: दीर्घ पद्धतीने वापरली जाते. संस्कृत अकारांत आहे. परिणामी लेखनादरम्यान समास, संधी यांचा वापर करताना अनेकांची फसगत होते. हे टाळत मराठीसाठीची स्वतंत्र लेखन पद्धती आकाराला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या नियमांचा सविस्तर मसुदा लवकरच महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन व चर्चेनंतर सुधारणा करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.