शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

आता मराठी व्याकरण होणार सहज सोपे

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

औरंगाबाद : संस्कृतप्रचूर प्राकृत मराठीचे रूप आता अधिक सहज सोपे होणार असून, शुद्धलेखनाचे नवे नियम लवकरच मूर्तरुपात येणार आहेत.

औरंगाबाद : संस्कृतप्रचूर प्राकृत मराठीचे रूप आता अधिक सहज सोपे होणार असून, शुद्धलेखनाचे नवे नियम लवकरच मूर्तरुपात येणार आहेत. गेली पाच दशके प्रलंबित असलेला हा प्रकल्प येत्या काळात लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.‘माझा मराठाचि बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. बोलताना साधी-सहज वाटणारी मराठी लिहिताना मात्र, अनेकदा किचकट व क्लिष्ट वाटते. ऱ्हस्व, दीर्घ, समास, संधी अशा रुपातील ही जाचक बंधने आता बरीचशी सैल होतील. यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली असून, ही समिती लवकरच आपला मसुदा शासनाला सादर करणार आहे. महामंडळाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीत भाषातज्ज्ञ प्रा. चंद्रकांत मरगज, व्याकरण अभ्यासक अरुण फडके, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, भाषाभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी व शोभा उबगडे यांचा समावेश आहे. व्याकरणाचे हे नवे नियम वापरण्याच्या दृष्टीने सुटसुटीत व लवचीक करण्यावर समितीचा भर असल्याचे सदस्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मराठी मुख्यत: दीर्घ पद्धतीने वापरली जाते. संस्कृत अकारांत आहे. परिणामी लेखनादरम्यान समास, संधी यांचा वापर करताना अनेकांची फसगत होते. हे टाळत मराठीसाठीची स्वतंत्र लेखन पद्धती आकाराला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या नियमांचा सविस्तर मसुदा लवकरच महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन व चर्चेनंतर सुधारणा करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.