शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आता सोसायटींच्या निवडणुकांची रणधुमाळी

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

रमेश शिंदे , औसा सोसायटी, पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष, दोन वर्षे उलटली आहेत़ परंतु,

रमेश शिंदे , औसासोसायटी, पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष, दोन वर्षे उलटली आहेत़ परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच नवीन सहकार कायदा यामुळे या संचालक मंडळांना मुदतवाढ मिळत गेली. पण आता विधानसभा निवडणुका संपल्या असतानाच सहकार क्षेत्रातील निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुदत संपलेल्या ५३ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आणि १४ पतसंस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत. या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५ सोसायट्या व १२ पतसंस्था, तर दुसऱ्या टप्प्यात ३८ सोसायट्या व २ पतसंस्थांच्या निवडणुका होत आहेत. गावपातळीवर होणाऱ्या या निवडणुका गावातील वर्चस्वासाठी महत्वाच्या असून, लवकरच या रणधुमाळीस प्रारंभ होत आहे. औसा तालुक्यात २७२ संस्था आहेत. यामध्ये ७६ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, ५१ मजूर सोसायट्या, ५५ गृहनिर्माण सोसायट्या, १८ कर्मचारी पतसंस्था, १५ नागरी व ग्रामीण पतसंस्था तर इतर ३३ अशी संस्थांची संख्या आहे. यामधील बहुतांश संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. कुणाला एक वर्ष, कुणाला दोन वर्षे तर कुणाला अडीच वर्षांची मुदतवाढ मिळाली. संचालक मंडळास मुदतवाढ मिळत असल्याने निवडणुका कधी होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले होते. पण आता दोन टप्प्यांत या निवडणुका होणार असून, डिसेंबर-जानेवारीमध्ये पहिला टप्पा तर जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दुसरा टप्पा अशा निवडणुका होणार असून, ११ नोव्हेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक वसंत घुले यांनी दिली आहे. औसा तालुक्यात पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या गावांमध्ये आशिव, लोदगा, शिवणी, देवंग्रा, याकतपूर, कारला, मोगरगा, उटी (बु.), खुंटेगाव, आंदोरा, चलबुर्गा, बोरगाव (न.), सिंदाळा (लो.), हिप्परगा, हारेगाव या १५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांसह औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, अजिम शिक्षक पतसंस्था, विद्यानिकेतन कर्मचारी पतसंस्था जवळगा (पो.), रामनाथ शिक्षक पतसंस्था आलमला, सुदर्शन कर्मचारी पतसंस्था सत्तरधरवाडी, साने गुरुजी खाजगी शिक्षक पतसंस्था औसा, कादरिया कर्मचारी पतसंस्था औसा, मुक्तेश्वर वीज कर्मचारी पतसंस्था औसा, समता नागरी पतसंस्था औसा, सुशिलादेवी किल्लारी, भूकंपग्रस्त किल्लारी, गणेशनाथ उजनी या सर्व संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता गावपातळीवरील निवडणुकांच्या रणधुमाळी सुरुवात होणार असून, निवडणुका लक्षात घेता आता गावा-गावांत निवडणुका आणि पॅनलच्या तयारीने वेग घेतला आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत आणि वि.का. सेवा सोसायट्या या स्थानिक राजकारणासाठी महत्वाच्या मानल्या जातात. आता हिवाळ्याची सुरुवात होत असून, ऐन थंडीत गावपातळीवरील राजकारणाला मात्र ऊब मिळणार आहे.