शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नाथ्रा ते दिल्ली व्हाया बीड

By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST

लोक नेतृत्व म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी अनेकांना आला.

लोक नेतृत्व म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी अनेकांना आला. बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मतांची घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच राहिली. निवडणुकीच्या आधीपासून गोपीनाथ मुंडे यांची विरोधकांनी चौफेर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. निवडणुकीचे संपूर्ण वातावरण पाहिले तर त्यांचा हा एकाकी लढा म्हणावा, इतपत त्यांची कोंडी करण्यात आली होती. स्वत: शरद पवार यांनी या मतदारसंघाला नको इतके महत्त्व दिल्याने बीड मतदारसंघात काय होईल, असे कोणी विचारले तर सांगणे कठिण होऊन बसले होते. बारामती विरूध्द बीड असेच स्वरूप या लढतीचे दिसू लागले होते. शरद पवार यांनी राज्यातील प्रचाराचा शुभारंभही बीड जिल्ह्यातून करून त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मुळात बीड राष्टÑवादीचे वर्चस्व असलेला जिल्हा. राष्टÑवादीत मतभेद असल्याची चर्चा निवडणुकीपूर्वी होत असली तरी शरद पवार यांनी सगळ्या नेत्यांना एकत्र आणत मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्याची रणनिती आखण्यात आली होती. त्यांना बीडमध्येच अडकवून ठेवण्याची भाषाही बोलली जात होती. राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले होते. जाहीर सभांमधूनही मुंडे यांच्यावर हल्ला केला जात होता. जिव्हारी लागणारी भाषा वापरली जात होती. तरीही ते विचलीत झाल्याचे कुठे दिसले नाही. त्यांच्या पराभवासाठी राष्टÑवादीचे दिग्गज एकत्र आले होते. पाच वर्षे खासदार असतानाही बीडच्या विकासासाठी त्यांनी काहीच केले नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यांचे पुतणे आणि आमदार धनंजय मुंडेही विरोधात आक्रमकपणे उतरले होते. असे हे सगळे घडत असताना मुंडे मात्र आत्मविश्वासाने कामाला लागले होते. त्यांच्या कन्या आणि आमदार पंकजा पालवे गावागावात जाऊन वडीलांचा प्रचार करीत होत्या. राष्टÑवादीचे आमदार विनायक मेटे यांच्यासह दोन माजी आमदार आणि बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड यांच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघात नेमके काय होईल, हे सांगणे कठिणच होते. राष्टÑवादीने तर मुंडे यांचा पराभव झाला हे गृहितच धरले होते. काही जणांनी मुंडे हे २० ते २५ हजार मतांनी निवडून येतील, असे सांगत त्यांचे मताधिक्य घटणार असल्याचा कयास बांधला होता. परंतु हे सगळे अंदाज आणि कयास चुकीचे ठरवित मुंडे यांनी मिळविला दणदणीत विजय हा लोकांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा विजयच म्हणावा लागेल. लोकनेता आणि नेतृत्व कसे असते, हेच या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिले आहे. या निवडणुकीत लोकांनी राष्टÑवादीला चकवा दिला आणि मुंडे यांना मताधिक्य दिले. राजकारणातील एक दिलदार व्यक्तीमत्व म्हणून मुंडे यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. मोठे झाले आणि त्यानंतर त्यांचे बोट सोडून दिले. तरीही त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही आणि आकसही नाही. माझं मीठच आळणी आहे, असे म्हणत त्यांनी आप्त-स्वकीयांनी केलेल्या जखमांवर फुंकरच घातली. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आल्याने एका नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. त्यांच्यामुळे आज बीडला पहिल्यांदाच केंद्रात कॅबिनेट मंत्रपद मिळाले आहे. मुळातच मुंडे यांचे नेतृत्व विकासाभिमुख असल्याने त्यांना मिळालेल्या संधीच ते सोन केल्याशिवाय राहणार नाहीत. राजकारणातील ३५ वर्षे संघर्षच करीत राहिलेल्या नेत्याला काम करण्याची मिळालेली ही संधी आहे. त्यांच्याकडून जशा देशाच्या अपेक्षा आहेत, तशा बीडकरांच्याही अपेक्षा आहेत. बीडचा रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रेल्वेचा प्रश्न सुटला तर या जिल्ह्यातील व्यवसायाला गती मिळेल. जिल्ह्यात मोठ-मोठे उद्योग व्यवसाय सुरू झाले तर बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. सिंचनाचा प्रश्नही सोडविणे आवश्यक आहे. बीडसाठी एखादे स्वतंत्र विद्यापीठच झाले तर शिक्षणाच्या नव्या संधी येथे उपलब्ध होतील. गोपीनाथ मुंडे यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी लोकांची अपेक्षा असेल तर ती वावगी नाही. ल्लप्रताप नलावडेनाथ्रा ते दिल्ली हा गोपीनाथ मुंडे यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय जीवनाचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द दिल्लीच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचली आहे. युती सरकारच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी यशाची मोहर उमटविली आहे. ग्रामीण जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि भाजपाला ग्रामीण भागात पोहोचविण्यातही त्यांनी केलेली कामगिरी विसरता येण्यासारखी नाही. प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राजकारणातील आपले स्थान मजबूत केले आहे. देशाचे ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही देशाच्या नकाशावर ते ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाहीत.