शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यावर नावापुरते महिला लोकशाही दिन

By admin | Updated: September 14, 2014 23:35 IST

भास्कर लांडे, हिंगोली महिलांची पायपीट थांबून स्थानिक ठिकाणीच त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने तालुकास्तरावर सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनास ग्रामीण भागातून उदासीनता दिसून येते.

भास्कर लांडे, हिंगोलीमहिलांची पायपीट थांबून स्थानिक ठिकाणीच त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने तालुकास्तरावर सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनास ग्रामीण भागातून उदासीनता दिसून येते. महिलांच्या हक्काचे संरक्षण होण्याऐवजी उलट आपले नाव उजागर होईल, या भीतीमुळे तक्रार देण्यास महिला पुढे येत नाहीत. परिणामी दीड वर्षातील १४ लोकशाही दिनात एकाही महिलेची तक्रार आली नसल्याने तालुकास्तरावर हा दिन नावालाच उरला आहे. महिलांच्या समस्या त्वरीत निकाली काढण्यात याव्यात, या हेतूने ४ मार्च २०१३ रोजी राज्य शासनाने लोकशाही दिन साजरा करण्याचा आदेश काढला. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर या निर्णयाची अंमलबजावणीचा आदेश दिला. पुढे मंत्रालय स्तरावरही समिती स्थापन करण्यात आली. खुद्द महिला व बालविकास मंत्रीच या समितीच्या अध्यक्ष आहेत. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन साजरा केला जातो. येथे बऱ्यापैकी प्रतिसाद असल्यामुळे आजपर्यंत झालेल्या १४ दिनात २९ तक्रारी आल्या. त्यातील २४ प्रकरणाचा निपटारा झाला. उर्वरित पाच प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात नगरपालिका आणि महावितरणचे अनुक्रमे २ आणि हट्टा पोलिस ठाण्याच्या मिळून ५ तक्रारींचा समावेश आहे. उलट स्थिती ग्रामीण भागातील आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महिला येण्यास धजावत नाहीत. तक्रारीसाठी शहरात जाऊन लोकांना सामोरे जाण्यास बहुतांश महिला तयार नसतात. म्हणून शासनाने तक्रारदार महिलांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी लोकशाही दिन ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर हा दिन ठेवला. त्याकडे महिलांनी पूर्णत: पाठ फिरवली. तक्रार नोंदणीचे रजिस्टरही उघडण्याची वेळ आली नाही. कर्मचाऱ्यांनाच तक्रारदार महिलांची वाट पहावी लागते. दीड वर्ष लोटत असताना एकही तक्रार आली नाही. चार लोकांत आपले नाव उघडे पडेल, या भीतीपोटी महिला तक्रारी देत नाहीत. नित्य परिचयाच्या लोकांसमोर जाण्यासही महिला तयार नाहीत. परिणामी ग्रामीण भागात महिलांमध्ये उदासीनता कायम असून अधिक जनजागृतीची गरज आहे.