शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

माझी भूमिका ही लोकमान्यांना आदरांजली

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : ‘मी पडद्यावर साकारलेली लोकमान्य टिळक यांची भूमिका म्हणजे त्यांच्या जीवित कार्याला वाहिलेली नम्र आदरांजली आहे

औरंगाबाद : ‘मी पडद्यावर साकारलेली लोकमान्य टिळक यांची भूमिका म्हणजे त्यांच्या जीवित कार्याला वाहिलेली नम्र आदरांजली आहे. हा चित्रपट पाहून आजच्या उच्चशिक्षित नवतरुणांमध्ये निर्माण झालेले डोळस देशप्रेम मला माझ्या कामाचे सार्थक झाल्याची भावना देते,’ या शब्दात चतुरस्र अभिनेता व रंगकर्मी सुबोध भावे याने ‘लोकमान्य’ चित्रपटाच्या निमित्ताने आपले मनोगत रसिकांपुढे मांडले.‘लोकमत’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलनात ‘लोकमान्य’ चित्रपटाचे युवा दिग्दर्शक ओम राऊत व सुबोध भावे यांनी आवर्जून उपस्थिती लावत हा चित्रपट पाहण्याचे रसिकांना आवाहन केले. कवी अरुण म्हात्रे यांनी दोघांना बोलते करत त्यांचा चित्रप्रवास उलगडला. लोकमतचा प्रवास व ध्येय उलगडणारी एक चित्रफीत दाखविण्यात आली. ‘लोकमान्य’ मधील काही क्षणचित्रेही चित्रफितीतून रसिकांनी पाहिली.वृत्तपत्राला ‘लोकमत’ हे नाव टिळकांनीच सुचवले असल्याने टिळकांशी लोकमतचा जुना ॠणानुबंध आहे. लोकमान्य टिळकांच्या भूमिकेची नस कशी सापडली या प्रश्नाचे उत्तर देताना भावे म्हणाले, ‘माझे व्यक्तिमत्त्व गोंडस, हळवे आणि विशेषत: डोळे रोमँटिक असल्याने अनेकांनी मी लोकमान्य साकारण्यासाठी मुळीच योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. मग मी भूमिकेचा रियाज म्हणून मुख्यत: लोकमान्य टिळकांची करारी नजर पाहत राहिलो. त्यांचे फोटो, पुतळे अशा सर्वांवर मी लक्ष केंद्रित केले. या नजरेत मला त्यांचा आत्मा गवसला.’ बालपणापासून केलेली नाटके महाविद्यालयातील एकांकिका यातून मी घडत गेलो. एका नाटकात केलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेने मला पहिल्यांदा आत्मविश्वास दिला. त्या अर्थाने औरंगजेब माझे प्रेरणास्थानच आहे, अशीही भावना त्याने मांडली. हा चित्रपट का बनवावासा वाटला याचे उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘आजच्या पिढीला खोट्या लढाया करणारे सुपरमॅन, बॅटमॅन माहीत आहेत; पण स्वातंत्र्यासाठी अनेक अवघड लढाया यशस्वीपणे जिंकणारे टिळक आमच्यापर्यंत नीट पोहोचले नाहीत. ते कळावेत, त्यातून काही प्रेरणा मिळावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. टिळकांनी तरुणांना सोबत घेऊन स्वराज्य मिळविले. आजच्या तरुणांनी त्याचे सुराज्य घडवावे.’ स्त्री भूमिका करणारे नाजूक बालगंधर्व व कणखर, बाणेदार टिळक या विरोधी भूमिका सुबोधने लीलया केल्या. कारण तो ‘अ‍ॅक्टर’ नसून ‘रिअ‍ॅक्टर’ आहे. व्यक्तिरेखेचा अंश स्वत:मध्ये भिनवत तो भूमिका जगतो, असेही राऊत म्हणाले. मुक्तसंवादाचा शेवट करताना सुबोधने सुधीर मोघे व अशोक नायगावकर यांच्या टिळकांवरील रचनांचे अभिवाचन केले.