शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महापालिकेने शपथपत्र दिल्लीला पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा वाद सध्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. वाॅर्ड आरक्षणासंदर्भात केलेली प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक असल्याचा ...

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा वाद सध्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. वाॅर्ड आरक्षणासंदर्भात केलेली प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक असल्याचा दावा महापालिकेने आपल्या शपथपत्रात केला आहे. शपथपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी दिल्लीला पाठविले आहे. २ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मनपाची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तत्पूर्वी महापालिकेने आणि राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रभाग रचनेविषयी समीर राजूरकर व इतरांनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाला नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने निवडणुकीच्या आनुषंगाने परिस्थिती ‘जैसे थे’ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एस. बोपन्ना व न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर एकदा सुनावणी झाली. यात न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका राज्य निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र तयार करून दिल्लीला पाठविले आहे, अशी माहिती उपायुक्त सुमंत मोरे यांनी दिली. २ तारखेपर्यंत हे शपथपत्र न्यायालयात पोहचणार असल्याचेही निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

--------------

महापालिका आपल्या निर्णयावर ठाम

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार वाॅर्ड आरक्षणाची पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे केली. त्याचे चित्रिकरणही करण्यात आले. तसेच आयोगाच्या प्रतिनिधी समोरच प्रक्रिया केल्याने यात काही गैर झाले नसल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्याने काही वाॅर्ड विशिष्ट उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून तयार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वाॅर्ड आरक्षित करण्यासाठी आणि खुले करण्यासाठी सोयीनुसार प्रगणक गटांची पळवापळवी कशा पद्धतीने केली आहे, याचे पुरावे याचिकाकर्त्याने सादर केले आहेत.