शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

व्याख्यानमालेची चळवळ सर्वसमावेश

By admin | Updated: April 8, 2015 00:49 IST

जालना : गेल्या ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेची परिवर्तन चळवळ सर्वसमावेशक असून शहराच्या

जालना : गेल्या ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेची परिवर्तन चळवळ सर्वसमावेशक असून शहराच्या या उपक्रमाची दखल राज्यात अनेक जिल्ह्यांनी देखील घेतली, अशी माहिती व्याख्यानमाला २०१५ चे अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी दिली.डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेस शहरात ८ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष म्हणून आ. अर्जुन खोतकर यांची निवड करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध विचारवंतांची मांदियाळी श्रोत्यांना मिळणार आहे. राज्य शासनाचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.निकाळजे म्हणाले, व्याख्यानमाला संयोजन समितीतर्फे दरवर्षी विविध जाती, धर्मातील व्यक्तींना या उपक्रमात सामावून घेतले जाते. डॉ. आंबेडकरांना जी समाजरचना अभिप्रेत होती, तोच विचार घेऊन व्याख्यानमालेचे कार्य अविरत सुरू आहे. ३८ वर्ष झाले, परंतु अद्याप व्याख्यानमालेस स्वत:ची इमारत उभी करण्यासाठी शासनाकडून जागा मिळाली नसल्याची खंत व्यक्त करून निकाळजे म्हणाले, आतापर्यंत लोकशाही अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी आपणास मिळालेली आहे. आपसात वर्गणी जमवूनच संयोजन समितीने हे सर्व उपक्रम राबविले, असेही निकाळजे म्हणाले. अनेक ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकारामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. ही परंपरा अखंडितपणे सुरू राहिल, असा दृढ विश्वास व्याख्यानमालेचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)