शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

मोबाईल चोरट्यांचा बाजारात धुमाकूळ

By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST

उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षी चोरट्यांनी धुमाकूळ घालत सर्वसामान्यांची झोप उडविली आहे़

उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षी चोरट्यांनी धुमाकूळ घालत सर्वसामान्यांची झोप उडविली आहे़ या चोऱ्यांचा तपास गुलदस्त्यात असताना आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे़ मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना पूर्णत: अपयश आले आहे़ मात्र, वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी प्रत्येक बाजारात शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत वाहतूक सुरळीत केल्याचा दावा बिनधास्त ठोकत असल्याने शेतकरी वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे़उस्मानाबाद शहरात रविवारी आठवडी बाजार भरतो़ आठवडी बाजारात उस्मानाबाद तालुका व परिसरातील अनेक शेतकरी, व्यापारी येतात़ मात्र, मागील काही महिन्यांपासून आठवडी बाजारात जाताना अनेकांच्या काळजाचा ठेका चुकत आहे़ मोबाईल चोरांसह भुरट्या चोरट्यांनी आठवडी बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ प्रत्येक आठवडी बाजारात किमान दहा ते बारा जणांचे मोबाईल चोरीस जातात़ तर अनेकांच्या खिशाला कात्री लागते़ यातील काहीजण पोलिसांकडे तक्रार अर्ज देतात़ मोबाईल वापस मिळणार नाही, याची खात्री असली तरी पुढील अडचणी नकोत व तोच मोबाईल क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात़ आज झालेल्या रविवारीच्या आठवडी बाजारातही जवळपास दहा ते बारा जणांचे मोबाईल चोरीस गेले आहेत़ यातील काही जणांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ एकीकडे चोरट्यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम आठवडी बाजाराच्या मुहूर्तावर सुरूच ठेवले असले तरी शहर ठाण्यात अपुरे कर्मचारी असल्याने चोरटे हाती लागत नसल्याचे तुणतुणे कायम आहे़एकीकडे जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा निर्माण झाली आहे तर दुसरीकडे राबराब राबून मोठ्या कष्टाने पिकविलेले माळवे, धान्य उस्मानाबादच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी अनेक शेतकरी घेऊन येतात़ मावळं, धान्य विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या संसाराचा गाडा चालणार असतो़ मात्र, काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर होणाऱ्या गर्दीमुळे व्यवसायवर परिणाम पडत असल्याचे सांगत पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडत असल्याचे शेतकरी सांगतात़ तर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे सांगत चक्क शेतकऱ्यांचे तराजू घेऊनच तेथून निघून जातात़ त्यामुळे या शेतकऱ्यांनी आणलेले धान्य, माळवं विकायचे कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे बोलणे साहेबांच्या वरच्या थाटात असते, त्यामुळे गरीब शेतकरीही मन मारून तेथून निघून जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे़ (प्रतिनिधी)आठवडी बाजारात पोलिस नाहीत !गत अनेक महिन्यांपासून मोबाईल चोरट्यांसह खिसे कापणाऱ्या चोरट्यांनी आठवडी बाजारात धुमाकूळ घातला आहे़ शेकडो तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात येवून पडले आहेत़ याची माहिती असतानाही एकही पोलिस कर्मचारी आठवडी बाजारात तैनात नसतो़ वाहतूक सुरळीत करण्यासाठी असलेले कर्मचारी ‘शेतकऱ्यांना सुरळीत’ करण्याच्या कामातच मग्न असतात़ त्यामुळे चोरट्यांना सुरळीत करून मुस्क्या अवळणार कोण हे सर्वसामान्यांना पडलेले कोडे न सुटणारे आहे़यांचे मोबाईल लंपासरविवारच्या आठवडी बाजारात ओमप्रकाश कुंभार (बेंबळी), गणेश राऊत (येडशी), राजू भावलकर (तुळजापूर), नागनाथ कुंभार, सुरेश वाघमारे (उस्मानाबाद) या पाच जणांसह जवळपास दहा ते बारा जणांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केले आहेत़