शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

मनपाचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

औरंगाबाद : शहरात १,५०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवले आहे.

औरंगाबाद : शहरात १,५०० कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा गवगवा करणाऱ्या महापालिकेने विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवले आहे. गेल्या आठवड्यातच ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळलेले नसून ३४ लाख रुपयांची खर्चमंजुरी मनपाने दिलेली नाही. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानातील १२ हजार विद्यार्थ्यांना एकेक गणवेश मिळाला. उर्वरित ८ हजार विद्यार्थी मात्र गणवेशाची प्रतीक्षा करीत आहेत. १५ आॅगस्ट रोजी मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत या दिशेने पालिका दरवर्षी निर्णय घेते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बीपीएलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत असत. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत. यासाठी पालिकेच्या फंडातून तरतूद करण्याचा निर्णय घेतला; परंतु तरतूद केलेली रक्कम कागदावरच राहिल्यामुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. मनपा शाळेतील २० टक्के विद्यार्थी ‘ढ’ राहिले आहेत. ‘ढ’ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली होती. ते विद्यार्थी हुशार झाले नाहीत तर शिक्षकांच्या वेतनवाढी कायमस्वरूपी थांबविण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांनी दिले होते. मात्र, आयुक्त जाताच तो आदेश मागे घेण्यात आला आहे. वेतनवाढ थांबविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा वेतनवाढ देण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी ए.एम. शेख यांनी सांगितले. जे विद्यार्थी ‘ढ’ राहिले आहेत. त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली असल्याचे त्यांनी सांगितले.