शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

लघु सिंचनाच्या कामांचा धडाका सुरूच

By admin | Updated: September 12, 2014 00:32 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद आचारसंहितेच्या तोंडावर लघु सिंचन विभागाने सुरू केलेला कामांच्या मंजुरीचा धडाका अजूनही थांबलेला नाही.

सुनील कच्छवे, औरंगाबादआचारसंहितेच्या तोंडावर लघु सिंचन विभागाने सुरू केलेला कामांच्या मंजुरीचा धडाका अजूनही थांबलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात १९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा आणखी ६० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ६४ कोल्हापुरी बंधारे आणि ४६ सिमेंट नाला बांधाची कामे केली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जलसंपदा विभागाने विकासकामांचा धडाका लावला आहे. आॅगस्टअखेरीस लघु सिंचन विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात सिमेंट नाला बांध आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या अनेक कामांना मंजुरी दिली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल १९ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातील बहुतांश कामे औरंगाबाद आणि सिल्लोड तालुक्यातील होती. त्यानंतर आता लघु सिंचन विभागाने फुलंब्री, वैजापूर, पैठण, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, तसेच औरंगाबाद तालुक्यांत आणखी काही कामे करण्याचे ठरविले आहे.या कामांना मंजुरी देत त्यांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा प्रसिद्ध करण्यावर जलसंपदाचा भर दिसून येत आहे. म्हणूनच गेल्या चार ते सहा दिवसांत या विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ६४ कोल्हापुरी बंधारे आणि ४६ सिमेंट नाला बांधांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या कामांची एकत्रित किंमत ५९ कोटी १३ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये फुलंब्री तालुक्यातील १२ कोटी, औरंगाबाद तालुक्यातील १५ कोटी आणि गंगापूर तालुक्यातील ९ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. तसेच कन्नड आणि खुलताबाद तालुक्यांतही ११ कोटी, पैठण तालुक्यात २ कोटी आणि वैजापूर तालुक्यात ४ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. वर्कआॅर्डरची लगबगलघु सिंचन विभागाने पंधरा दिवसांपूर्वी १९ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यातील ज्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना वर्कआॅर्डर देण्याची लगबग सध्या सुरू आहे. आचारसंहितेपूर्वी वर्कआॅर्डर मिळविण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदारांकडून केला जात आहे. परिणामी लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात गर्दी वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यास मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जात आहे. या कामांमुळे आगामी काळात टंचाईवर मात होण्यास मदत होणार आहे.