शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

लघु सिंचनाच्या कामांचा धडाका सुरूच

By admin | Updated: September 12, 2014 00:32 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद आचारसंहितेच्या तोंडावर लघु सिंचन विभागाने सुरू केलेला कामांच्या मंजुरीचा धडाका अजूनही थांबलेला नाही.

सुनील कच्छवे, औरंगाबादआचारसंहितेच्या तोंडावर लघु सिंचन विभागाने सुरू केलेला कामांच्या मंजुरीचा धडाका अजूनही थांबलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात १९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा आणखी ६० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ६४ कोल्हापुरी बंधारे आणि ४६ सिमेंट नाला बांधाची कामे केली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जलसंपदा विभागाने विकासकामांचा धडाका लावला आहे. आॅगस्टअखेरीस लघु सिंचन विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात सिमेंट नाला बांध आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या अनेक कामांना मंजुरी दिली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल १९ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातील बहुतांश कामे औरंगाबाद आणि सिल्लोड तालुक्यातील होती. त्यानंतर आता लघु सिंचन विभागाने फुलंब्री, वैजापूर, पैठण, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, तसेच औरंगाबाद तालुक्यांत आणखी काही कामे करण्याचे ठरविले आहे.या कामांना मंजुरी देत त्यांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा प्रसिद्ध करण्यावर जलसंपदाचा भर दिसून येत आहे. म्हणूनच गेल्या चार ते सहा दिवसांत या विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल ६४ कोल्हापुरी बंधारे आणि ४६ सिमेंट नाला बांधांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या कामांची एकत्रित किंमत ५९ कोटी १३ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये फुलंब्री तालुक्यातील १२ कोटी, औरंगाबाद तालुक्यातील १५ कोटी आणि गंगापूर तालुक्यातील ९ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. तसेच कन्नड आणि खुलताबाद तालुक्यांतही ११ कोटी, पैठण तालुक्यात २ कोटी आणि वैजापूर तालुक्यात ४ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. वर्कआॅर्डरची लगबगलघु सिंचन विभागाने पंधरा दिवसांपूर्वी १९ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यातील ज्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना वर्कआॅर्डर देण्याची लगबग सध्या सुरू आहे. आचारसंहितेपूर्वी वर्कआॅर्डर मिळविण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदारांकडून केला जात आहे. परिणामी लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात गर्दी वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यास मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जात आहे. या कामांमुळे आगामी काळात टंचाईवर मात होण्यास मदत होणार आहे.