शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वीजबिल वसुलीविरोधात एमआयएमतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST

औरंगाबाद : महावितरणच्या वतीने थकीत वीजबिलांची वसुली सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होते तरीही वीजबिल देण्यात ...

औरंगाबाद : महावितरणच्या वतीने थकीत वीजबिलांची वसुली सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होते तरीही वीजबिल देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलमाफी करण्याची घोषणा महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केली होती परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचे वीजबिल माफ करण्यात आले नाही. महावितरणकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीविरोधात सोमवारी एमआयएमतर्फे मिल कॉर्नर येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात खासदार इम्तियाज म्हणाले की, शासनाने ग्रामीण भागातील ४२ लाख ग्राहकांचे ४५ हजार कोटी थकीत विद्युत वीजबिल माफ केले. औरंगाबाद शहरातील वीजबिलापोटी दरमहा महावितरणला ५४ कोटींचे उत्पन्न मिळते. लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करण्यास शासनाची काय हरकत आहे. राज्य शासनाने सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष पँकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. थकीत वीजबिल वसुली थांबविण्यात यावी. शेतकऱ्यांचे कृषिपंपांचे वीजजोडणी खंडित करू नये. वीजबिल माफ करण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल कमी करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नासेर सिद्दीकी, शेख अहेमद, जमीर कादरी, विकास एडके, अरुण बोर्डे, हाजी इसाक खान, जगन्नाथ उगले, काकासाहेब काकडे, फेरोज खान, अबुल हसन हाशमी, रफत यारखान, मुन्शी पटेल, वाजिद जागिरदार, अब्दुल अजिम इन्कलाब, जिशान देशमुख, आवेज दुर्रानी आदींची उपस्थित होते.

कॅप्शन... धरणे आंदोलनात सहभागी झालेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते.