शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

आधारभूत खरेदी केंद्राकडे शेतीमालाचे कोट्यवधी थकित

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

भूम : आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडून तीन-तीन महिने मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

 भूम : शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडून तीन-तीन महिने मालाचे पैसे मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीत हरभर्‍याचे १ कोटी १२ लाख तर तुरीचे १ कोटी सोळा लाख रूपये थकित आहेत. खरिपाची पेरणी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असून, त्यासाठी शासनाने त्वरित हे पैसे द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवाजी खरेदी-विक्री संघ आणि फेडरेशनच्या वतीने २५ मार्च २०१४ रोजी येथे आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली होती. याला शेतकर्‍यांकडून प्रतिसादही चांगला मिळाला. केंद्रावर जवळपास ३ हजार ६४४ क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली. परंतु, याचे पैसे मात्र अद्याप मिळाले नसल्याचे शेतकरी सांगतात. याबाबत अधिक माहिती घेतली असता हरभरा उत्पादक जवळपास २३० शेतकर्‍यांचे १ कोटी १२ लाख ९७ हजार ९५० रूपये थकल्याची माहिती समोर आली. याशिवाय तुरीची विक्री केलेल्या शेतकर्‍यांनाही १ कोटी १६ लाख रूपये गेल्या तीन महिन्यांपासून मिळालेले नाहीत. यामुळे अगोदरच गारपीट, अवकळी पाऊस, वादळ या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांसमोर विकलेल्या मालाचेही पैसे मिळत नसल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर) फेडरेशनकडे पाठपुरावा सुरू शेतकर्‍यांना तुरीचे मागील पैसे व केंद्र सुरू झाल्यापासून थकलेले हरभर्‍याचे पैसे देण्यासाठी फेडरेशनकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून रक्कम उपलब्ध होताच ती तातडीने शेतकर्‍यांना वाटप केली जाील, असे शिवाजी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक आर. जी. बागडे यांनी सांगितले. २२ मेनंतर आंदोलन उभारू सध्या खरिपाच्या पेरण्या तोंडावर आल्या असून, शेतकरी आर्थिक संकटात आहेत. हा विचार करून शेतकर्‍यांचे थकलेले हरभर्‍याचे पैसे त्वरित द्यावेत. २२ मेपर्यंत हे पैसे नाही दिल्यास तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. वेअरहाऊस नसल्याने अडचणीत भर भूम येथे खरेदी केलेला हरभरा ठेवण्यासाठी वेअरहाऊस उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या दररोज सातशे ते आठशे क्विंटल हरभर्‍याची मापे होत असून, खरेदी केलेला हरभरा मोहोळ येथील वेअरहाऊसकडे घेऊन जावा लागत आहे. परिणामी माल खरेदीसही विलंब होत आहे.