शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

आधारभूत खरेदी केंद्राकडे शेतीमालाचे कोट्यवधी थकित

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

भूम : आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडून तीन-तीन महिने मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

 भूम : शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडून तीन-तीन महिने मालाचे पैसे मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीत हरभर्‍याचे १ कोटी १२ लाख तर तुरीचे १ कोटी सोळा लाख रूपये थकित आहेत. खरिपाची पेरणी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असून, त्यासाठी शासनाने त्वरित हे पैसे द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवाजी खरेदी-विक्री संघ आणि फेडरेशनच्या वतीने २५ मार्च २०१४ रोजी येथे आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली होती. याला शेतकर्‍यांकडून प्रतिसादही चांगला मिळाला. केंद्रावर जवळपास ३ हजार ६४४ क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली. परंतु, याचे पैसे मात्र अद्याप मिळाले नसल्याचे शेतकरी सांगतात. याबाबत अधिक माहिती घेतली असता हरभरा उत्पादक जवळपास २३० शेतकर्‍यांचे १ कोटी १२ लाख ९७ हजार ९५० रूपये थकल्याची माहिती समोर आली. याशिवाय तुरीची विक्री केलेल्या शेतकर्‍यांनाही १ कोटी १६ लाख रूपये गेल्या तीन महिन्यांपासून मिळालेले नाहीत. यामुळे अगोदरच गारपीट, अवकळी पाऊस, वादळ या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांसमोर विकलेल्या मालाचेही पैसे मिळत नसल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर) फेडरेशनकडे पाठपुरावा सुरू शेतकर्‍यांना तुरीचे मागील पैसे व केंद्र सुरू झाल्यापासून थकलेले हरभर्‍याचे पैसे देण्यासाठी फेडरेशनकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून रक्कम उपलब्ध होताच ती तातडीने शेतकर्‍यांना वाटप केली जाील, असे शिवाजी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक आर. जी. बागडे यांनी सांगितले. २२ मेनंतर आंदोलन उभारू सध्या खरिपाच्या पेरण्या तोंडावर आल्या असून, शेतकरी आर्थिक संकटात आहेत. हा विचार करून शेतकर्‍यांचे थकलेले हरभर्‍याचे पैसे त्वरित द्यावेत. २२ मेपर्यंत हे पैसे नाही दिल्यास तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. वेअरहाऊस नसल्याने अडचणीत भर भूम येथे खरेदी केलेला हरभरा ठेवण्यासाठी वेअरहाऊस उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या दररोज सातशे ते आठशे क्विंटल हरभर्‍याची मापे होत असून, खरेदी केलेला हरभरा मोहोळ येथील वेअरहाऊसकडे घेऊन जावा लागत आहे. परिणामी माल खरेदीसही विलंब होत आहे.