शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग ध्यानधारणा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 01:28 IST

डॉक्टर ते भिक्खूपर्यंतचा प्रवास उलगडला; प्रमाहा केराती यांनी साधला शहरातील डॉक्टरांशी संवाद

- विशाल सोनटक्केऔरंगाबाद : आधुनिक काळात ताण-तणाव वाढल्यानेच आरोग्याचे प्रश्न जटिल झालेत. अशा स्थितीत रुग्णाला एकाग्रतेच्या माध्यमातून मन:शांती मिळवून देण्याची गरज आहे. हे काम ध्यानधारणा प्रभावीपणे करते. त्यामुळे अनेक आजारांसाठी रुग्णांना मी मेडिसीनऐवजी मेडिटेशन लिहून देतो. ध्यानधारणा हे आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग असल्याचे डॉ. प्रमाहा केराती (थायलंड) यांनी सांगितले.जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने शुक्रवारी ‘आयएमए’च्या सभागृहात डॉ. प्रमाहा केराती यांनी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रमाहा थिरस्वत, डॉ. पांगपट यांच्यासह आरोग्य विभागाचे सहा. संचालक डॉ. जी. एम. गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, सचिव डॉ. यशवंत गाडे, डॉ. संतोष रंजलकर, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सावजी, कैलास झिने, डॉ. रेखा गायकवाड, प्रा. ज्योती गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. प्रमाहा केराती यांचे वैद्यकीय शिक्षण अमेरिकेत झाले असून, एंडोक्रायनोलॉजी सुपर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते थायलंड येथे भिक्खूंना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. याबरोबरच थायलंडमधील रुग्णालयात ध्यानधारणेचे प्रशिक्षणही देतात. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. केराती यांनी आपला डॉक्टर ते भिक्खू हा प्रवास कसा झाला याची माहिती दिली. कुटुंबातील बहुतांश सदस्य वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे मीही वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो. मात्र कालांतराने माझी एका बौद्ध धम्मगुरूशी ओळख झाली आणि त्याद्वारे ध्यानधारणा पद्धतीचे आकर्षण वाढले. ध्यानधारणेचा सखोल अभ्यास केल्यानंतर ही पद्धती अनेकांचे जगणे सुखकर आणि आनंददायी करू शकते याची जाणीव झाल्याने ही पद्धती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले.जगण्यातला आनंद वाढला पाहिजे. तो ध्यानधारणेच्या माध्यमातूनच वाढू शकतो यावर दृढविश्वास असल्याचे ते म्हणाले. मागील काही वर्षात रक्तदाब, मधुमेह तसेच मेंदूच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. मानसिक तणाव हे याचे प्रमुख कारण आहे. ध्यानधारणेमुळे एकाग्रता वाढते. ध्यानाचा खरा अर्थ स्वत:च्या अस्तित्वाचा खोलवर जाऊन विचार करणे, हे प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ध्यानधारणेमुळे मन प्रसन्न राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. माणूस आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायला लागतो. आजार, वेदना कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.