शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

मराठवाड्यात पावसाची तूट कायम

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

औरंगाबाद : आॅगस्टअखेरीस सर्वत्र जोरदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील पावसाची तूट कायम आहे.

औरंगाबाद : आॅगस्टअखेरीस सर्वत्र जोरदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील पावसाची तूट कायम आहे. विभागात ७ सप्टेंबरपर्यंत सरासरी ५७९ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात आजपर्यंत सरासरी ३५७ मिमी इतकाच पाऊस झाला आहे. हा पाऊस आजपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या तब्बल ३९ टक्के कमी आहे. मराठवाड्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाचे सावट निर्माण झाले. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मराठवाड्यात कुठेही पाऊस न झाल्यामुळे ठिकठिकाणची लहान- मोठी धरणे कोरडी पडली. त्यामुळे विभागात सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जुलै महिन्यातही जेमतेम पाऊस झाला. आॅगस्टअखेरीस मात्र आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला, तरीही आधीचे दोन महिने खूपच कमी पाऊस झाल्यामुळे पावसाला अद्याप अपेक्षित सरासरी गाठता आलेली नाही. मराठवाड्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७९ मिमी इतके आहे, तर आजपर्यंतची अपेक्षित सरासरी ५७९ मिमी आहे. मात्र, विभागात आजपर्यंत सरासरी ३५७ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी विभागात आजपर्यंत अपेक्षित सरासरीच्या ७८ टक्के पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण अवघे ६१ टक्के आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे अवघा ४९ टक्के पाऊस झाला आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या ७१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाअपेक्षित पाऊस पडलेला पाऊसटक्केवारी (मिमी)(मिमी) औरंगाबाद५०६३५६ ७० जालना५१४३१८६१ परभणी५८५३१८५४ हिंगोली६८०३९०५७ नांदेड७१६३५६४९ बीड४९१३३३६७ लातूर५९६३९३६६ उस्मानाबाद५४४३८९७१ एकूण५७९३५७६१ तीन महिने उलटले तरी पुरेसा पाऊस न झाल्याने सप्टेंबर महिन्यावर संपूर्ण मदार अवलंबून आहे. जायकवाडीत ३५ टक्के; विभागात ३० टक्के पाणीसाठा जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वच भागांतील धरणे ओसंडून वाहत असली, तरी मराठवाड्यातील प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. विभागातील लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून सरासरी ३० टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणात मात्र ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातील १५४ प्रकल्पांमध्ये सरासरी ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर पुणे विभागातील ३६८ धरणेही ओसंडून वाहत आहेत. येथील प्रकल्पांमध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागात ७३ टक्के, नाशिक विभागातील प्रकल्पही सरासरी ६६ टक्के भरले आहेत. मराठवाड्यात मात्र आजही केवळ ३० टक्के साठा आहे. मराठवाड्यात एकूण ११ मोठे प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये केवळ ३७ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्पांची परिस्थिती याहीपेक्षा नाजूक आहे. विभागातील ७५ प्रकल्पांत सरासरी अवघा १७ टक्के साठा आहे, तर लघु प्रकल्पांमध्ये हा साठा १२ टक्के आहे. मराठवाड्यात एकूण ७१८ लघु प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांतील साठा अजूनही जोत्याखालीच आहे. चार मोठे प्रकल्प कोरडेच विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्वर, मांजरा, निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव ही धरणे अजूनही कोरडीच आहेत, तर सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ३५ टक्के साठा आहे. येलदरी धरणात ४६ टक्के, माजलगाव धरणात ७ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा धरणात ६० टक्के, मनार धरणात २२ टक्के, विष्णुपुरी धरणात शंभर टक्के आणि निम्न दुधना धरणात ६२ टक्के साठा आहे.