शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपात घोटाळ्याची ‘अस्वच्छता’

By admin | Updated: January 20, 2017 23:55 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात घनकचरा व्यवस्थापनावर कागदी मेळ घालून साडेचार वर्षांत २० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात घनकचरा व्यवस्थापनावर कागदी मेळ घालून साडेचार वर्षांत २० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. जो की बेकायदेशीर असून, आॅनलाईन निविदा नाहीत. शिवाय, करार करण्याचा अधिकार नसताना स्वच्छता निरीक्षकांनी करारनामा केला आहे. बाँड मे महिन्याचा तर वाहनांचा पुरवठा मार्च महिन्यात दाखविला आहे. शिवाय, करारनाम्याची तारीखच त्यात नमूद नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. लातूर शहरातील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या स्वच्छता विभागामार्फत ४९ ट्रॅक्टर व ८५ अ‍ॅपे एजन्सीमार्फत लावण्यात आले. या वाहनांचे क्रमांक करारनाम्यात नाहीत. मालकाचे नाव नाही, कचरा वाहून नेण्यासाठी कमीत कमी रुपयांची निविदा ज्यांनी दाखल केली आहे, त्यांना काम देण्याऐवजी ज्यांची निविदा सर्वात जास्त रकमेची आहे, अशांनाच कामे देण्यात आली आहेत. शहरातील कचरा गोळा करणे, डम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेऊन टाकणे, यासाठी अनेक ट्रॅक्टर व अ‍ॅपे वाहने लावण्यात आली. त्याची निविदा न काढताच कामे देण्यात आली असून, या कामांवर २ कोटी १५ लाख ७१ हजार ६५० रुपये खर्च करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये स्वच्छता विभागाअंतर्गत ही निविदा काढण्यात आली नाही. महाराष्ट्र महानगरपालिका सुधारित अधिनियम १९४९ चे कलम ४५३ परिशिष्ट-१ प्रकरण ५/१ अन्वये करारनामा आयुक्त/उपायुक्त यांनी करणे आवश्यक असताना स्वच्छता विभागाने करारनामा केला आहे, तो चुकीचा आहे. २०१४-१५ मधील करारनाम्यातील अटी व शर्थींप्रमाणे अ‍ॅपे व ट्रॅक्टर वाहनांचे लॉकबुक लिहिलेले नाही. आदी मुद्यांबाबत लेखापरिक्षकांनीही ठपका ठेवला. सदर खर्च केलेली रक्कम चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा ठपका लेखापरिक्षकांचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. करारनामा करीत असताना वाहनपुरवठा दिनांक व करारनामा करण्याचा दिनांक हा अगोदरचा असून, १०० रुपयांचा स्टॅम्प नंतर खरेदी करण्यात आल्याचे दिसत आहे. करारनामा करताना कित्येक ठिकाणी वाहनांचा प्रकार नोंदविला गेला नाही. अ‍ॅपे आहे की ट्रॅक्टर आहे, याची नोंद नाही. शिवाय, वाहनांचा पुरवठा दिनांक व करारनामा दिनांक कोरा आहे. बऱ्याच करारनाम्यांवर स्वाक्षऱ्याही नाहीत. ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. वाहनांचे लॉकबुक ठेवले नसल्यामुळे कचऱ्याच्या शहरातून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत किती फेऱ्या झाल्या?, या फेऱ्या कशा मोजल्या? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवाय, लेखापरिक्षकांनी नोंदविलेल्या मतांवर चर्चाही का केली गेली नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, माहिती अधिकारातील कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी ही माहिती उघड करण्यासाठी पाठपुरावा केला असून, स्वच्छता विभागात झालेल्या या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी राज्याचे नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली आहे. लेखापरिक्षकामार्फत चौकशी करून संबंधितांवर शासकीय नियमानुसार कारवाई करावी, असेही नगरविकास सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)