शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

वाळूज भागातून मनपाला पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:19 IST

शहरातील विविध भागांत सडत असलेला कचरा बुधवारी सकाळी वाळूज भागातील खंडेवाडी-नायगव्हाण भागात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. ११ ट्रक रिकामे केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. नागरिकांना हा अवतार पाहून मनपा प्रशासनाला पाय लावून पळावे लागले.

ठळक मुद्देकच-याचा प्रश्न: जंगजंग पछाडूनही अपयश पदरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील विविध भागांत सडत असलेला कचरा बुधवारी सकाळी वाळूज भागातील खंडेवाडी-नायगव्हाण भागात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. ११ ट्रक रिकामे केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. नागरिकांना हा अवतार पाहून मनपा प्रशासनाला पाय लावून पळावे लागले.मनपा प्रशासनाने मंगळवारी रात्रीच खंडेवाडी शिवारात खाजगी व्यक्तीच्या जागेवर कचरा टाकण्याचा प्लॅन आखला होता. प्लॅननुसार सकाळी ६ वाजता कचरा टाकण्यात आला. पहिला प्रयोग यशस्वी होताच मनपाने दुसºया टप्प्यातील ट्रकही या भागात बोलावून घेतले. ट्रक वाळूज-हनुमंतगावमार्गे पैठण तालुक्यातील खंडेवाडी-नायगव्हाण शिवाराकडे जाताना नागरिक व शेतकºयांनी पाहिले. काही नागरिकांनी या ट्रकचा पाठलाग केला. खंडेवाडी शिवारातील एका मोठ्या खड्ड्यात कचरा आणून टाकला जात असल्याचे दिसले. नागरिकांनी ट्रक अडविले. घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर, गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी अधिकाºयांना घेराव घालत कचरा डेपो सुरू करण्यास विरोध दर्शविला. कचरा डेपो सुरू करण्यापूर्वी आम्हाला विष द्या, कचºयाच्या गाड्यांखाली आम्ही झोपू, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने अधिकाºयांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी वाळूजचे काकासाहेब चापे, दयानंद साबळे, ग्रामपंचायत सदस्य पपीन माने, थॉमस साबळे आदींसह हनुमंतगाव, नायगव्हाण, खंडेवाडी, नायगाव आदी भागांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सहा. पोलीस आयुक्त डी.एन. मुंढे, पो.नि. सतीश टाक आदींचा फौजफाटा घटनास्थळी होता.शासनाच्या सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत पैठणखेडा ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. याठिकाणी कचरा डेपो सुरू करू नये, अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले. या निवेदनावर सरपंच लता ढगे, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर राघुडे, सोमीनाथ देसाई, दत्तात्रय देसाई, बाबासाहेब गरड, कल्याण राघुडे, बाळू गरड, उत्तम गायकवाड, पंडित पवार, शिवसिंग राणा, सोनाली देसाई, प्रभू गायकवाड आदींची स्वाक्षरी आहे.नारेगावमुळे सर्वत्र बदनामीमनपाने सर्वप्रथम पैठण रोडवर बाभूळगाव, पडेगाव-मिटमिटा, चिकलठाणा आदी भागांत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला; पण मनपाला यश आले नाही. मनपाच्या नारेगाव प्रकल्पाची एवढी बदनामी झाली आहे की, मनपाला कुठेच कचरा टाकण्याची परवानगी मिळणे शक्य नाही.