शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

महावितरण ठाण्यातील आग शॉटसर्किटमुळेच

By admin | Updated: September 17, 2014 01:11 IST

जालना : वीज वितरण कंपनीच्या सहा जिल्ह्यांसाठी जालन्यात असलेल्या पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड रुमला ८ जुलै रोजी लागलेल्या संशयित आग प्रकरणी

जालना : वीज वितरण कंपनीच्या सहा जिल्ह्यांसाठी जालन्यात असलेल्या पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड रुमला ८ जुलै रोजी लागलेल्या संशयित आग प्रकरणी विद्युत निरीक्षकांनी केलेल्या चौकशीअंती ही आग शॉटसर्किटमुळेच झाल्याचा दावा महावितरणच्या सूत्रांनी केला आहे. विशेष म्हणजे या आगीत वीज चोरीसंबंधीच्या अकराशे गुन्ह्यांची कागदपत्रे जळाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्य अभियंत्यांनीच व्यक्त केला होता. या रेकॉर्ड रूममध्ये महावितरणच्या वसूली पथकांनी जप्त केलेले मीटर्स, वायर इत्यादी माल ठेवलेला होता. तसेच एक रॅक व कपाटामध्ये वीज चोरीसंबंधी सदरील पोलिस ठाणे स्थापनेपासून दाखल असलेल्या एफआयआर ची कागदपत्रे होती. आगीमध्ये ही कागदपत्रे जळाली. मात्र मीटर्स, वायरचा माल सुरक्षित राहिला. या संशयित आगीबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ च्या १० जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने यासंबंधीचा अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांकडून मागवून घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या आगीची चौकशी करण्यात येत असल्याचे जालना दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.दरम्यान, विद्युत निरीक्षकांनी आपल्या चौकशी अहवालात या ठाण्याच्या इमारतीमधील विद्युत जोडणी व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.सुमारे दीड महिन्यांपूर्वी हा अहवाल सादर होऊनही अद्याप ही जोडणी बदलण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)सदरील पोलिस ठाणे जालन्यासह औरंगाबाद, परभणी, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी आहे. ठाण्याची स्थापना होऊन आठ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे या कालावधीतील पोलिसांशी संबंधित सर्व रेकॉर्ड याच रुममध्ये ठेवण्यात आलेले होते. परंतु यामधील ११०० गुन्ह्यांच्या संचिका जळाल्यामुळे त्या प्रकरणांच्या तपासाचे काय? याविषयी महावितरणकडून दीड महिन्यानंतरही कुठलाही खुलासा झालेला नाही.