शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

लोकप्रतिनिधींकडेच शौचालयांचा अभाव !

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात ७८७ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या हजार ते बाराशे लोकप्रतिनिधींकडे शौचालय नाहीत़

लातूर : लातूर जिल्ह्यात ७८७ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या हजार ते बाराशे लोकप्रतिनिधींकडे शौचालय नाहीत़ जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शौचालय बांधण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना, ग्रा़प़ंसदस्यांकडे शौचालयाचा अभाव आहे़ तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांनी शौचालय बांधण्यासाठी मुदतवाढ दिली होती़ या मुदतवाढीत काही सदस्यांनी शौचालय बांधली. परंतु, काहींनी अद्याप त्याकडे कानाडोळा केला आहे़ विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाऱ्या ग्रामसेवकांनी पाठपुरावा केला नसल्यामुळे ग्रा़पं़सदस्यांची शौचालये पूर्ण झाली नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्यास शौचालय असण्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते़ शासनाने तशी अटच घातली होती़ परंतु मध्यंतरीच्या काळात ही अट शिथिल करण्यात आली़ निवडणुकीनंतर तीन-चार महिन्यात शौचालय बांधावे अशी अट घातली़ त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत असलेल्या उमेदवारांनी शौचालय न बांधता उमेदवारी ठेवली़ त्यातील काही निवडुनही आले़ बराच कालावधी होऊनही अनेकांनी शौचालय बांधली नाहीत़ जवळपास जिल्ह्यात १२०० ग्रा़प़ं सदस्यांकडे अद्यापही शौचालय नाहीत़ लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांच्यापुढे शौचालय नसणाऱ्या ग्रा़पं़ सदस्यांची सुनावणी झाली़ त्यावेळी तात्काळ शौचालय बांधा अन्यथा आपले सदस्यत्व अपात्र ठरविले जाईल, असे निर्देश दिले होते़ त्यावेळी काही सदस्यांनी शौचालय बांधली़ परंतु काहींनी या निर्देशाकडे दुर्लक्ष केले़ जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतीमध्ये किमान एक-दोन सदस्यांकडे शौचालय नाहीत़ जरी असले तरी त्याचा वापर नाही़ सध्या लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यात १५८, जळकोट तालुक्यातील ११, अहमदपूर तालुक्यातील ८८, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील १९, जळकोट तालुक्यात २७, निलंगा तालुक्यात १२, देवणी तालुक्यात ७, चाकूर तालुक्यात ७, औसा तालुक्यात ९ व उदगीर तालुक्यात १७ ग्रा़प़ं सदस्यांकडे शौचालय नसल्याची माहिती स्वच्छता विभागाकडे आहे़ (प्रतिनिधी)शौचालय नसलेल्या ग्रा़पं. सदस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार होती़ परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सुनावणी झाली नाही़ आता जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग ज्या सदस्यांकडे शौचालय नाही, त्याची माहिती घेत आहे़ ही माहिती पूर्ण आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़ ग्रामसेवकांकडे ज्यांच्याकडे शौचालय नाही याची माहिती असते़ परंतु त्याची माहिती गट विकास अधिकाऱ्यांकडे येत नाही़ गट विकास अधिकारीही ही माहिती घेण्यास उशीर करतात़ त्यामुळेही ग्रा़प़ं सदस्यांकडे शौचालयाचा अभाव आहे़ लातूर जिल्ह्यात यंदा ३६००० शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते़ मात्र हे उद्दिष्टही साध्य करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे़ केवळ ८७१४ शौचालय बांधण्यात आली आहेत़ ५० टक्केही उद्दिष्ट प्राप्ती झाली नाही़ शौचालय बांधण्याचा नुसताच गाजावाजा प्रशासन करीत आहेत. त्यातच ग्रामपंचायत सदस्यांनीही शौचालये बांधली नाहीत.