शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

डाव्या कालव्याला पाणी सोडले

By admin | Updated: May 19, 2014 01:08 IST

तीर्थपुरी: जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे नाथसागरातून पैठण डाव्या कालव्यात ३०० क्युसेक्स पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले.

 तीर्थपुरी: जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे नाथसागरातून पैठण डाव्या कालव्यात ३०० क्युसेक्स पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले. ज्या ठिकाणी पाणी साठवन करता येते त्या ठिकाणी पाणी अडवले जाणार असल्याने त्या भागातील विहिरीची पाणी पातळी वाढणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाने पैठण डाव्या कालव्यात १५ मे रोजी रात्री पाणी सोडले. हे पाणी तीर्थपुरी पर्यंत आले आहे. पैठण, अंबड, घनसावंगी, पाथरी, परतूर, मानवत, परभणी आदी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होणार, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. त्यामुळेच परिसरातील शेतकर्‍यांनी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री राजेश टोपे यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. ती मान्य करून जायकवाडी पाटबंधारे विभागाला तटकरे यांनी पाणी सोडण्याबाबत सुचना दिली होती. ‘लोकमत’ नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, त्याची दखल घेवून हे पाणी सोडण्यात आले. प्रत्येक ठिकाणी साठवणार पाणी पैटण डाव्या कालव्यावर ज्या ठिकाणी कॅनल मध्ये ज्या ठिकाणी पाणी साठवता येते अशा डाव्या कालव्यावरील गोपेवाडी, विहामांडवा, वडीगोद्री, तीर्थपुरी, आष्टी दरम्यान पाणी सोडण्यात येणार असून पाणी साठविणार असल्याचे शाखा अभियंता भागवत मापारी यांनी सांगितले. या ठिकाणी अडीच मीटर उंच तर पाच ते सहा किमी लांब असे पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे.१२२ किमी पाणी गेल्यास २०० क्युसेक्स पाणी जास्तीचे सोडण्यात येणार आहे. एकूण ५०० क्युसेक्स पाणी अतिरिक्त सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर)