शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

कायद्याचे संरक्षक गारठ्याने त्रस्त! चार वर्षांपासून स्वेटरच मिळाले नाहीत

By admin | Updated: December 8, 2014 00:24 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद शहरातील सुमारे १५ लाख नागरिक रात्री शांतपणे झोपू शकतात. कारण कायद्याचे संरक्षक त्यांच्यासाठी रात्रीही सेवेत असतात.

मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरातील सुमारे १५ लाख नागरिक रात्री शांतपणे झोपू शकतात. कारण कायद्याचे संरक्षक त्यांच्यासाठी रात्रीही सेवेत असतात. मात्र, मागील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढताच कायद्याचे संरक्षकही त्रस्त झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत रात्री पेट्रोलिंग करावी तरी कशी, असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे. तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरही मिळालेले नाहीत.चार दिवसांपूर्वीच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या सुधारक गंथळे या कर्मचाऱ्याचा थंडीने गारठून मृत्यू झाला. या घटनेने राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना विचार मंथन करण्यास भाग पाडले आहे. रात्री चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत. व्यापारी, नागरिकांच्या मालमत्ता सुरक्षित राहाव्यात म्हणून पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल ओतून काम करीत असतात. पोलिसांच्या वारंवार गस्त, कडा पहारा लक्षात घेऊन अनेक गुन्हेगार पळ काढतात.खाकी वर्दीत वावरणारे पोलीस कर्मचारीही माणूसच आहेत, याचा विसर सत्ताधाऱ्यांना नेहमीच पडतो. कालपर्यंत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, पोलीस यंत्रणेच्या विविध प्रश्नांवर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे विरोधकच आज सत्तेत बसले आहेत. सत्तेच्या खुर्चीची ‘ऊब’ पाहून सत्ताधाऱ्यांना कालच्या प्रश्नांचा विसर पडला की काय, अशी शंका अनेकांना वाटत आहे.