शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लातूरकरांना टंचाईच्या झळा

By admin | Updated: July 19, 2014 00:41 IST

लातूर : शहर महानगरपालिका हद्दीत पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत़

लातूर : शहर महानगरपालिका हद्दीत पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत़ १५ दिवसातून एकवेळा नळाला मिळणारे पाणी अपुरे मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत़ पाणी साठवणुकीसाठी काहीजणांकडे अपुरे साहित्य असल्याने गैैरसोय होत आहे़ शिवाय, जास्त दिवस साठवलेल्या पाण्याचा वास येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़गेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने गेल्यावर्षी पावसाळ्यातही लातूरकरांना आठ दिवसाआड पाणी मिळत होते़ यावर्षी तर गतवर्षीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे़ उन्हाळ्यात आठ दिवसांनी नळाला पाणी येत होते़ पावसाळा सुरू झाल्यापासून लातूरचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे़ मांजरा धरणातून सुरु असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने नागझरी बॅरेजेसमधून पाणी उपसा सुरु करण्यात आला़ मात्र दोन्ही प्रकल्पांत अत्यल्प पाणी असल्याने पाणी वाटपावर काही निर्बंध घालण्यात आले़ प्रकल्पातच पाणी नसल्याने लातूरकरांची पाण्यासाठी भटकंती दिवसेंदिवस वाढतच गेली़मनपाच्या सार्वजनिक विंधन विहिरी व हातपंपानेही तळ गाठल्याने जलसंकट गंभीर झाले़ त्यातच नागरिकांचा पाण्यासाठी रोष वाढत असल्याचे लक्षात येताच महानगरपालिकेने प्रारंभी आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता़ नागरिकांची मागणी ज्याप्रमाणे वाढत गेली़ त्याप्रमाणे टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे़ सध्या लातूर महानगरपालिकेचे २ व खाजगी १६ टँकर्सद्वारे शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा गेल्या वर्षभरापासून विस्कळीत झाला आहे़ नळाला पाणी येत नसल्याची ओरड नळधारकांतून वाढत चालली आहे़ एखाद्या भागात पाणी सोडले की, कधीकधी आठ-आठ तास पाणी एकाच भागात सुरु असते़ एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण असताना दुसरीकडे मात्र मोटारी लावून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जाते़ ही परिस्थिती मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रशासनाला लक्षात येऊनही यावर उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया जाते़ सध्या नळाला पंधरा ते अठरा दिवसांनी पाणी येत आहे़ नळाला येत असलेले पाणी अपुरे मिळत आहे, अशी नागरिकांतून ओरड वाढत चालली आहे़ गाव भागात काही ठिकाणी विंधन विहिरींचा आधार उरला आहे़ शहरालगत नव्याने वसलेल्या वसाहतीत तीव्र पाणीटंचाई वाढलेली आहे़ तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे़ १८ टँकरद्वारे सुरू आहे शहरात पाणी पुरवठा़़़ महानगरपालिकेच्या वतीने शहरात पाणीटंचाई वाढल्याने १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ गेल्या आठवड्यात मागणी वाढल्याने ४ टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे़ ज्या भागातून मागणी येईल, अशा ठिकाणी टँकर पाठविले जात आहे़ आठवडाभरात झालेल्या पावसामुळे टंचाईची ओरड कमी झाली आहे़ शिवाय, मांजरा प्रकल्पातही किंचीत वाढ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी पोहचविण्यात येत आहे़ शहरालगतच्या वसाहती तहानलेल्या़़़़लातूर शहरातील गांधी नगर, कॉईल नगर, उस्मानपुरा, बरकत नगर, सम्राट चौक, काजी मोहल्ला, अंजली नगर, बुऱ्हाण नगर, खाडगाव रोड, बौध्द नगर, तावरजा कॉलनी आदी भागांत पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत़ शिवाय, शहरालगत वसलेल्या बार्शी रोडवरील राजे शिवाजीनगर, वसवाडी, अंबाजोगाई रोडवरील पठाण नगर, जाफर नगर, नांदेड रोडवरील नवीन वसाहतींमध्ये पाण्याची तीव्र टंचाई वाढली आहे़ पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा वाढल्याने लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे़ मांजरा धरणात यावर्षी पावसाळ्यात पाणीसाठा न वाढल्यास लातूरकरांना पुढच्या वर्षीही पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने सध्या पाण्यासाठी टँकरवर नागरिकांची गर्दी होत आहे़