शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्तच

By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST

लातूर : नजर आणेवारीत चुकलेले प्रशासन अखेर आता सुधारित हंगामी आणेवारी काढताना दुरुस्त करुन आले आहे. महसूल प्रशासनाने काढलेली

लातूर : नजर आणेवारीत चुकलेले प्रशासन अखेर आता सुधारित हंगामी आणेवारी काढताना दुरुस्त करुन आले आहे. महसूल प्रशासनाने काढलेली आताची सुधारित आणेवारी वस्तुस्थितीला धरुन असल्याचे विविध पक्ष शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु आता टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तगड्या उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या. आता शेतकऱ्यांच्या साऱ्या नजरा पिकविम्याकडे लागल्या आहेत. त्यात यंदा प्रथमच हवामानावर आधारित पिकवीम्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या पिकविम्यासाठी महसूलची ही आणेवारी उपयोगी पडणार आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर जिल्ह्यात रबीच्या फक्त दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेराच नसल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. ऊस हे एकमेव हिरव्या चाऱ्याचे पीक असले तरी यंदा उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. जनावरांची जिल्ह्यातील संख्या मात्र दहा लाख ४१ हजार ७१७ च्या घरात आहे. एवढ्या जनावरांना ऐन उन्हाळ्यात जगवायचे असेल तर शेतकऱ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न आहे. मोठ्या शेतकऱ्यांकडील जनावरे कशीबशी जगतीलही. परंतु एक-दोन हेक्टरच्या आत शेती असलेल्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी शासकीय पातळीवर मोठ्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे यंदा मोठे संकट आहे. लातूरसारख्या साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरासह तालुक्याची ठिकाणेही पिण्याच्या पाण्यासाठी आत्ताच तहानलेली दिसत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाची अत्यंत गरज आहे. शिवाय द्यायचे म्हंटले पाणी आणायचे कुठून हा प्रश्न प्रशासनापुढे आहे. यावर ठोस पावले उचलत प्रशासनाने आत्ताच जिल्हाभरातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत. शिवाय आरक्षित पाण्याचा शेतीला उपसा होऊ नये म्हणून शेजारील गावांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ही राबविण्यात आली आहे. परंतु डिसेंबर नंतर पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचा यक्षप्रश्न आहे.