शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्तच

By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST

लातूर : नजर आणेवारीत चुकलेले प्रशासन अखेर आता सुधारित हंगामी आणेवारी काढताना दुरुस्त करुन आले आहे. महसूल प्रशासनाने काढलेली

लातूर : नजर आणेवारीत चुकलेले प्रशासन अखेर आता सुधारित हंगामी आणेवारी काढताना दुरुस्त करुन आले आहे. महसूल प्रशासनाने काढलेली आताची सुधारित आणेवारी वस्तुस्थितीला धरुन असल्याचे विविध पक्ष शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु आता टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तगड्या उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या. आता शेतकऱ्यांच्या साऱ्या नजरा पिकविम्याकडे लागल्या आहेत. त्यात यंदा प्रथमच हवामानावर आधारित पिकवीम्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या पिकविम्यासाठी महसूलची ही आणेवारी उपयोगी पडणार आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर जिल्ह्यात रबीच्या फक्त दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेराच नसल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. ऊस हे एकमेव हिरव्या चाऱ्याचे पीक असले तरी यंदा उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. जनावरांची जिल्ह्यातील संख्या मात्र दहा लाख ४१ हजार ७१७ च्या घरात आहे. एवढ्या जनावरांना ऐन उन्हाळ्यात जगवायचे असेल तर शेतकऱ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न आहे. मोठ्या शेतकऱ्यांकडील जनावरे कशीबशी जगतीलही. परंतु एक-दोन हेक्टरच्या आत शेती असलेल्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी शासकीय पातळीवर मोठ्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे यंदा मोठे संकट आहे. लातूरसारख्या साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरासह तालुक्याची ठिकाणेही पिण्याच्या पाण्यासाठी आत्ताच तहानलेली दिसत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाची अत्यंत गरज आहे. शिवाय द्यायचे म्हंटले पाणी आणायचे कुठून हा प्रश्न प्रशासनापुढे आहे. यावर ठोस पावले उचलत प्रशासनाने आत्ताच जिल्हाभरातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत. शिवाय आरक्षित पाण्याचा शेतीला उपसा होऊ नये म्हणून शेजारील गावांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ही राबविण्यात आली आहे. परंतु डिसेंबर नंतर पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचा यक्षप्रश्न आहे.