शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नव्या बायपाससाठी लवकरच भूसंपादन

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. बायपासच्या कामासाठी वाल्मी वगळता इतर सहा कार्यालयांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे नवीन बायपाससाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनीच सांगितले. औरंगाबाद शहरातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरून नेण्याचा निर्णय नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीने दोन वर्षांपूर्वीच घेतला. त्यानुसार हायवे अ‍ॅथॉरिटीने नवीन बायपास निश्चित केला. त्यासाठी सुमारे ५६० कोटी रुपयांची तरतूदही केली. नियोजित बायपासच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर भूसंपादनाच्या संचिका दीड वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केल्या. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बायपाससाठी भूसंपादन करण्याआधी मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, रस्ते विकास महामंडळ, वाल्मी आदी शासकीय विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याची अट घातली. त्यामुळे गेल्या वर्ष दीड वर्षापासून हे काम रखडले होते. दरम्यान, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी मनपा, सार्वजनिक बांधकाम, सिडको, रस्ते विकास महामंडळ, नगररचना विभाग आदींकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविले आहे. नवीन बायपासमुळे या विभागांचे रस्ते प्रभावित होणार आहेत. वाल्मीने अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. वाल्मीची काही एकर जमीन बायपासमध्ये जाणार आहे. ही जागा देण्यास वाल्मी प्रशासनाचा विरोध आहे. मात्र, आता पाच विभागांनी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे जिल्हा प्रशासन भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास तयार झाले आहे. विक्रमकुमार यांनी आज सांगितले की, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीचे अधिकारी येत्या दोन दिवसांत आमच्याकडे संबंधित विभागांची नाहरकत प्रमाणपत्रे सादर करणार आहेत. वाल्मीने नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तेथून मार्ग वळविण्याचा पर्याय आहे. तो अवलंबिला जाईल किंवा नियोजित मार्ग कायम ठेवून भूसंपादनाची कार्यवाही केली आहे. जवळपास सर्वच विभागांच्या एनओसी मिळाल्यामुळे आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नियोजित बायपाससाठी भूसंपादनाच्या संचिका पाठविल्या होत्या. मात्र, हा नियोजित बायपास सध्याच्या बीड बायपासपासून एक ते दीड किलोमीटर इतक्या जवळून समांतर रेषेत जात असल्यामुळे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याला आक्षेप घेतला. हा बायपास आणखी दुरून न्यावा, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी नवीन पर्यायांचा अभ्यास केला. नवीन पर्यायांमुळे बायपासचे अंतर ५२ वरून ७५ किलोमीटर होणार असल्यामुळे ते परवडणारे नसल्याचा अहवाल हायवे अ‍ॅथॉरिटीने दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र घेऊन येण्याची अट घातली. या सर्व घडामोडींमुळे बायपासचे काम रखडले. प्रकल्पाचा खर्च ५० कोटींनी वाढलासाताऱ्याच्या डोंगरातून जाणारा हा बायपास ५२ किलोमीटरचा आहे. सुरुवातीला या कामाचा खर्च सुमारे ५६० कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षभरात किंमत १० टक्के म्हणजे सुमारे ५६ कोटी रुपये इतकी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.असा राहील बायपासचा मार्गबायपासची सुरुवात झाल्टा फाट्याच्या दीड किलोमीटर अलीकडून होईल. गांधेली, सहारा सिटी, साताऱ्यातील डोंगराजवळून वाल्मीच्या मागील डोंगरातून पैठण रोडपर्यंत येऊन पोहोचेल. तेथून सिडको महानगरच्या रस्त्याने एएस क्लब रस्त्याला येऊन मिळेल.तेथून वडगाव कोल्हाटी, भांगसीमाता गड, माळीवाडा, कसाबखेडामार्गे वेरूळ रस्त्यावर हा महामार्ग जाऊन मिळेल.