शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

२०० अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

By admin | Updated: June 20, 2014 00:13 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़

सुनील चौरे , हदगावतालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़ आता पावसाळ्यात या अंगणवाड्या बंद असतात़ किंवा मग मोडकळीला आलेल्या जि़ प़ शाळांत, अंगणवाडी ताईच्या घरीच भरविल्या जातात़ ही समस्या ३० वर्षांपासून आहे़एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुलभूत उद्दिष्ट सहा वर्षाखालील बालके, गर्भवती व स्तनदा माता याचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच शालेयपूर्व श्क्षिणास उत्तेजन देण्यासाठी मुलभूत सेवा पुरविणे हे आहे़ या सेवा म्हणजे लसीकरण, पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य श्क्षिण आणि शालेय पूर्व शिक्षण होय़ ही योजना गावपातळीवर राबविली जाते़यासाठी ५५३ मंजूर बालविकास प्रकल्प असून या बालविकास प्रकल्पासाठी ३६४ ग्रामीण, १०४ नागरी व ८५ आदिवासी क्षेत्रात आहेत़ जिल्हा वार्षिक योजना, बीआरजीएफ, ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत अंगणवाडीच्या बांधकामासाठी निधी येत असतो़इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़ २८२ अंगणवाड्यांपैकी एकाही अंगणवाडीत वीजजोडणी नाही़ ३० वर्षांपासून अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या जि़प़शाळा, समाजमंदिर, किंवा अंगणवाडी ताईच्या घरीच भरतात़ तालुक्यात २७८ अंगणवाड्या सध्या सुरू आहेत़ यामध्ये २५ हजार ९७८ विद्यार्थी शालेय पूर्व शिक्षणाची तोंडओळख करून घेतात़ सर्व शिक्षण अभियानांतर्गत अडगळीच्या ठिकाणी वाडी-तांड्यावर शाळेच्या इमारती १० वर्षात शेकडो उभ्या राहिल्यात़ परंतु अंगणवाडीची उपेक्षा संपता संपेना़ चार-पाच वर्षाला प्रत्येक गावात नवीन अंगणवाडीला मान्यता मिळते़ एका सर्कलच्या गावात ५ ते १० अंगणवाड्याची संख्या झाली़ १ हजार लोकसंख्यावरून ५०० लोकसंख्येला एक अंगणवाडी मंजूर झत्तली़ सुरूही झाली़ परंतु स्वत:चे छत मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही़ ज्या वयात स्वच्छतेचे धडे गिरविले जातात, त्यांना मात्र उकिरड्यावर, उघड्यावर पोषक आहार दिला जातो़ वर्षातील आठ महिने ठीक आहे़ तेवढ्या अडचणी येत नाहीत़ परंतु पावसाळ्यात कुठे बसायचे, अंगणवाडीत कसे गायचे, हा प्रनच आहे़ अनेक गावांत किरायाने खोल्या मिळत नाही़ जिथे मिळतात त्यांना शासन नियमाने अत्यल्प किराया वर्षाला, दोन वर्षाला मिळतो़ इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़