शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२०० अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

By admin | Updated: June 20, 2014 00:13 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़

सुनील चौरे , हदगावतालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़ आता पावसाळ्यात या अंगणवाड्या बंद असतात़ किंवा मग मोडकळीला आलेल्या जि़ प़ शाळांत, अंगणवाडी ताईच्या घरीच भरविल्या जातात़ ही समस्या ३० वर्षांपासून आहे़एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुलभूत उद्दिष्ट सहा वर्षाखालील बालके, गर्भवती व स्तनदा माता याचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच शालेयपूर्व श्क्षिणास उत्तेजन देण्यासाठी मुलभूत सेवा पुरविणे हे आहे़ या सेवा म्हणजे लसीकरण, पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य श्क्षिण आणि शालेय पूर्व शिक्षण होय़ ही योजना गावपातळीवर राबविली जाते़यासाठी ५५३ मंजूर बालविकास प्रकल्प असून या बालविकास प्रकल्पासाठी ३६४ ग्रामीण, १०४ नागरी व ८५ आदिवासी क्षेत्रात आहेत़ जिल्हा वार्षिक योजना, बीआरजीएफ, ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत अंगणवाडीच्या बांधकामासाठी निधी येत असतो़इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़ २८२ अंगणवाड्यांपैकी एकाही अंगणवाडीत वीजजोडणी नाही़ ३० वर्षांपासून अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या जि़प़शाळा, समाजमंदिर, किंवा अंगणवाडी ताईच्या घरीच भरतात़ तालुक्यात २७८ अंगणवाड्या सध्या सुरू आहेत़ यामध्ये २५ हजार ९७८ विद्यार्थी शालेय पूर्व शिक्षणाची तोंडओळख करून घेतात़ सर्व शिक्षण अभियानांतर्गत अडगळीच्या ठिकाणी वाडी-तांड्यावर शाळेच्या इमारती १० वर्षात शेकडो उभ्या राहिल्यात़ परंतु अंगणवाडीची उपेक्षा संपता संपेना़ चार-पाच वर्षाला प्रत्येक गावात नवीन अंगणवाडीला मान्यता मिळते़ एका सर्कलच्या गावात ५ ते १० अंगणवाड्याची संख्या झाली़ १ हजार लोकसंख्यावरून ५०० लोकसंख्येला एक अंगणवाडी मंजूर झत्तली़ सुरूही झाली़ परंतु स्वत:चे छत मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही़ ज्या वयात स्वच्छतेचे धडे गिरविले जातात, त्यांना मात्र उकिरड्यावर, उघड्यावर पोषक आहार दिला जातो़ वर्षातील आठ महिने ठीक आहे़ तेवढ्या अडचणी येत नाहीत़ परंतु पावसाळ्यात कुठे बसायचे, अंगणवाडीत कसे गायचे, हा प्रनच आहे़ अनेक गावांत किरायाने खोल्या मिळत नाही़ जिथे मिळतात त्यांना शासन नियमाने अत्यल्प किराया वर्षाला, दोन वर्षाला मिळतो़ इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़