शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

काश्मीर जलप्रलयाचा फटका ट्रॅव्हल उद्योगाला

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : काश्मीरमध्ये जलप्रलयानंतर अजूनही लाखो पर्यटक अडकून पडले आहेत.

औरंगाबाद : काश्मीरमध्ये जलप्रलयानंतर अजूनही लाखो पर्यटक अडकून पडले आहेत. अडकलेले पर्यटक सुखरूप पोहोचावेत यासाठी शासकीय, निमशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादेतील ट्रॅव्हल उद्योगाला जलप्रलयाचा मोठा फटका बसला आहे.औरंगाबादहून काश्मीरला मोठ्या संख्येने पर्यटक जातात. काही भाविकही वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जात असतात. पर्यटक आणि भाविकांमुळे औरंगाबादेतील ट्रॅव्हल उद्योगाला मोठा आर्थिक हातभार लागत असतो. वर्षभरात एका ट्रॅव्हल एजन्सीकडून किमान ३०० हून अधिक नागरिक ये-जा करतात.शहरात काश्मीर आणि इतर पर्यटनस्थळांना जाण्यासाठी सुमारे २५ पेक्षा अधिक ट्रॅव्हल एजन्सी आहेत. अनेक एजन्सीधारक मुंबई, दिल्ली येथील मोठ्या एजन्सीधारकांशी कनेक्ट आहेत. वर्षभरात पाच हजारांहून अधिक भाविक, पर्यटक काश्मीरला जात असतात. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काश्मीरमधील अनेक शहरे पाण्यात बुडाली आहेत. पाणीपातळी कमी होण्यास तयार नाही. लाखो पर्यटक विविध हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत.औरंगाबादेतील सहा पर्यटक बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंबीय आणि ट्रॅव्हल कंपन्या चिंतेत आहेत. या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने प्रशासनही चिंतातुर आहे. पावसाळ्यात किंवा बर्फवृष्टी होणाऱ्या दिवसांमध्ये काश्मीरला जाऊ नये, असा सल्ला ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांना देतात. काही पर्यटक हा सल्ला न ऐकता स्वत:च्या रिस्कवर जातात. काश्मीरमध्ये एप्रिल ते जून चांगले हवामान असते. या दिवसात जायला अजिबात हरकत नसते. हनीमुनसाठी अनेक जोडपे काश्मीरलाच प्राधान्य देतात. कुटुंबासह या दिवसांमध्ये जाणे योग्य असल्याचे ट्रॅव्हल कंपन्या सांगतात.जम्मू-काश्मीर बँकऔरंगाबादेत जालना रोडवरील कुशलनगर येथे जम्मू- काश्मीर बँकेची शाखा आहे. या शाखेत काश्मीरशी आर्थिक व्यवहार करणारे ग्राहकच नाहीत. त्यामुळे बँकेच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मॅनेजर सिन्हा यांनी सांगितले.