शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील प्रत्येक घटकांना न्याय

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

हिंगोली : भाजपच्या पहिल्याच अर्थसंकल्पाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हिंगोली : भाजपच्या पहिल्याच अर्थसंकल्पाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोणाचीही उपेक्षा होणार नाही, याची काळजी घेत प्रत्येक घटकाला काहीं ना काही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी, कामगारांपासून ते नोकरदार, जेष्ठांसाठी उत्तम निर्णय जाहीर करीत लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु देशामध्ये वित्तीय तुट मोठी असल्याने या निर्णयांची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे अवघड जाणार आहे. ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा खरी ठरविण्याचा प्रयत्न गुरूवारी वित्तमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. लोकांनी डोंगराऐवढ्या अपेक्षा ठेवल्याने अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले होते. शेतकऱ्यांपासून व्यवसायिकांपर्यंत प्रत्येकाला योग्य निर्णयाची आस लागली होती. अपेक्षांचे ओझे असताना गुरूवारी अरूण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यात समाजातील कोणत्याही घटकाला नाराज न करता काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांपासून व्यवसायिकांपर्यंत प्रत्येकासाठी नवीन निर्णय आणि घोषणा करण्यात आल्या आहेत. विशिष्ट वर्ग, समाज, राज्य, भूभागाला झुकते माप दिले नसल्यामुळे या अर्थसंकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेहमीच दुजाभाव मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेण्यात आले आहेत. पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडल्याने नागरिक सुखावले आहेत; परंतु या योजनांची अंमलबजावनी करण्यासाठी शासनाची तिजोरी खाली आहे. कोरड्या तिजोरीमुळे सर्व निर्णय राबविण्याचे आव्हान भाजपसमोर निर्माण झाले आहे. म्हणून निर्णय जाहीर करून मोकळे होण्याबरोबरच त्याची फळे सामान्यांना चाकता यावीत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नद्या जोडणीच्या दृष्टीने पाऊल- आकाश रोकडेदेशात पावसाची अनियमितता आणि अनिश्चितता असल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. सर्वाधिक नद्या असतानाही देशात कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक आहे. नद्यांमार्फत सुमद्राला जाणारे पाणी नदी जोडणीच्या माध्यामातून मैदानी प्रदेशात वळवण्यास वाव आहे. म्हणून नदीजोडणी अभ्यासासाठी १०० कोटी रूपये देवून नदीजोडणीसाठी एक पाऊस पुढे टाकले आहे. शेतकऱ्यासाठी चांगले निर्णय- कुंडलिक अवचारकाहींनी कर्ज थकविल्यामुळे सरसगट शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका धजावत नाहीत. त्याचा विचार करीत कर्ज वसुलीसाठी स्वतंत्र धोरण आखत कर्जाच्या पुर्नबांधणीसाठी नाबार्डला ५०० कोटी रूपये दिले आहेत. शिवाय वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३० टक्के दराने कर्जवाटपाचा घेतलेला निर्णय अत्यंत उपयोगी आहे. त्याचा निश्चित फयादा शेतकऱ्यांना होणार आहे.कामगारांच्या भल्याचा निर्णय- गणेश राठोडदिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांना उतारवयात आर्थिक विवंचनेला समोरे जावे लागते. तेंव्हा हातपाय चालत नसल्याने कामातून पैसाही मिळविता येत नाही. पहिल्यांदा अशा कामगारांचा विचार करीत या अर्थसंकल्पात कामगाराला १००० रूपये पेन्शन योजना लागू केली. या निवृत्त वेतनामुळे कामगार स्वखर्चासाठी आत्मनिर्भर झाले आहेत.ईशान्य भारताचा विचार- केशव लांडगेकायम उपेक्षित राहिलेल्या इशान्य भारताचा पहिल्यांदाच विचार केला आहे. या भागात रेल्वेचे जाळे तयार करण्यासाठी १ हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. भविष्यात तयार होणाऱ्या रेल्वेमार्गामुळे प्रवाशांच्या सुविधेबरोबर ते संरक्षणाच्या दृष्टीने उपयोगी पडणार आहे. सर्वसमावेशक अर्थसंकल्प-विलास नायककोणत्याही एका वर्गाचा, समाजाचा, भूभागाचा, राज्याचा विचार न करता सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प मांडला आहे. सौंदर्य प्रसाधने, आमंली पदार्थ, कोल्ड्रींगचे दर वाढवित जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण आण्याचा घेलेला निर्णय लोकहिताचा आहे. सामान्यांपासून उच्चवर्णीयांपर्यंत सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. हेल्दी बजेट- दिलीप झंवरसर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात करामध्ये सुट दिली असली तरी हे बजट देशाच्या विकास तसेच सुरक्षेकरिता जागरूकता दाखविणारे आहे. करदात्यांकरिता करमाफीची मर्यादा ५० हजार रूपयांनी वाढविली तर गृहकर्जावरील व्याजाची सुट ५० हजाराने वाढविली आहे. त्यामुळे मागील करदेयके सुमारे दीड लाख रूपयांचे उत्पन्न करमुक्त होणार आहेत. कारण मागील सरकारने तिजोरी पूर्णत: खाली केल्याने ही मर्यादा सरकारला जास्त वाढविता आली नसल्याचे दिसते; मात्र देशाच्या सुरक्षेसाठी ‘एफडीआय’ची युनिट वाढविणे म्हणजे देशाची प्रगती व सुरक्षितता वाढविणे होय. अच्छे दिनची सुरूवात - अ‍ॅड. संजय टालेअर्थसंकल्पात चांगले निर्णय घेतले असून औषधी, खाद्य पदार्थ, चप्पल, बुट, तेल, साबन, टी.व्ही. मोबाईल, कॉम्पूटर स्वस्त होणार आहेत. त्यामुळे एका प्रकारे अच्छे दिनची सुरूवात आहे. योजनांची अंमलबजावनी आवश्यक - स्मिता नायकलोकांना खूष करण्यासाठी अनेक योजना तसेच निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येकाला भरमसाठ निधी दिला आहे; परंतु योजना राबविण्यासाठी लागणारा पैैसा कोठून आणणार आहेत. आधीच वित्तीय तुट असल्यामुळे शासनाच्या तिजोरीत पैैसा नाही. त्यामुळे नुसत्या घोषणा करून कौतुक मिळविण्यापेक्षा आहे त्या योजनांची व्यवस्थीत अंमलबजावनी करणे आवश्यक होते. सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारा- डॉ. मनोज साबूकेंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात डिझेल व एलपीजी गॅसचे दर वाढविण्याचे संकेत मिळत असल्याने सर्वसामान्यंना काहीअंशी महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. शिवाय महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. औद्यागिक धोरणाची नांदी- गोपाल ढोणेराष्ट्रीय उद्योग कॅरिडोअरचे मुख्यालय पुण्यात देण्याचा निर्णय राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. दुसरीकडे औद्योगिक स्मार्ट सिटी उभारणीमुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत. सिटीमुळे शिक्षणापासून रोजगारापर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी असल्याने स्थलांतर होणार नसून सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करता येईल. ... वाढविलेले भाव योग्य-चंद्रकांत डुकरेसिगारेट, गुटखा, पानमसाला आदी तंबाखूजन्य पदार्थांची ११ ते ७२ टक्क्यांनी केलेली दरवाढ अत्यंत योग्य आहेत. कारण या पदार्थांचे सेवन करणारा वर्ग भरमसाठ पैैसेवाला आहे. सर्वसामान्य माणूस या पदार्थांपासून लांब असल्याने त्याचे दर वाढल्याने सामान्यांना फटका बसणार नाही.