शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

६५ टक्क्यांपेक्षा अधिक साठ्यामुळे आता जायकवाडीला ‘वरचे’ पाणी नाही!

By admin | Updated: October 18, 2016 00:33 IST

औरंगाबाद :६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद : जायकवाडीत सध्या ८२ टक्केपाणीसाठा आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार जायकवाडीत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबरला पाण्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी समन्यायी पाणी वाटपाची बैठक गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात झाली. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने खरिपासाठी २० टीएमसी पाणी वापरले असल्याचेही या बैठकीद्वारे समोर आले. बैठकीला नाशिकचे मुख्य अभियंता एस. ए. वाघमारे, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मुख्य अभियंता अरुण कांबळे, प्रभारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ए. पी. कोहीकर, उपअधीक्षक अभियंता पी. पी. संत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड या पाच समूहातून एकूण ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या पाचही समूहातून प्रकल्पीय अहवालातील तरतुदीनुसार ८६० द.ल.घ.मी. पाणी उचलण्याची तरतूद आहे. यामध्ये मुळा समूहातून १५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यात सिंचनासाठी १३१ द.ल.घ.मी. आणि पिण्यासाठी १३.२९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे.या समूहातून प्रकल्पातील खरिपासाठीची वापराची तरतूद १७२ द.ल.घ.मी. इतकी आहे. प्रवरा समूहातून म्हणजे भंडारदरा व निळवंडेतून १४६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी प्रकल्पीय तरतूद २६० द.ल.घ.मी. इतकी आहे. गंगापूर समूहातून ४२ द.ल.घ.मी. पाणी वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. केवळ नाशिक शहरास पिण्यासाठी ३७.७ द.ल.घ.मी. तर औद्योगिक १.७ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. दारणा समूहातून म्हणजे दारणा, कडवा, भाम, भावली, मुकणेमधून १६८ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. त्यांना पाणी वापरासाठी २८४ द.ल.घ.मी. प्रकल्पीय तरतूद आहे. पालखेड समूहातून म्हणजे वाघाड, करंजवण, ओझरवेअर, पालखेडमधून ५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. प्रकल्पीय तरतूद १२१ द.ल.घ.मी.ची आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीद्वारे पुढे आली आहे.