शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

६५ टक्क्यांपेक्षा अधिक साठ्यामुळे आता जायकवाडीला ‘वरचे’ पाणी नाही!

By admin | Updated: October 18, 2016 00:33 IST

औरंगाबाद :६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद : जायकवाडीत सध्या ८२ टक्केपाणीसाठा आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार जायकवाडीत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबरला पाण्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी समन्यायी पाणी वाटपाची बैठक गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात झाली. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने खरिपासाठी २० टीएमसी पाणी वापरले असल्याचेही या बैठकीद्वारे समोर आले. बैठकीला नाशिकचे मुख्य अभियंता एस. ए. वाघमारे, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मुख्य अभियंता अरुण कांबळे, प्रभारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ए. पी. कोहीकर, उपअधीक्षक अभियंता पी. पी. संत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड या पाच समूहातून एकूण ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या पाचही समूहातून प्रकल्पीय अहवालातील तरतुदीनुसार ८६० द.ल.घ.मी. पाणी उचलण्याची तरतूद आहे. यामध्ये मुळा समूहातून १५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यात सिंचनासाठी १३१ द.ल.घ.मी. आणि पिण्यासाठी १३.२९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे.या समूहातून प्रकल्पातील खरिपासाठीची वापराची तरतूद १७२ द.ल.घ.मी. इतकी आहे. प्रवरा समूहातून म्हणजे भंडारदरा व निळवंडेतून १४६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी प्रकल्पीय तरतूद २६० द.ल.घ.मी. इतकी आहे. गंगापूर समूहातून ४२ द.ल.घ.मी. पाणी वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. केवळ नाशिक शहरास पिण्यासाठी ३७.७ द.ल.घ.मी. तर औद्योगिक १.७ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. दारणा समूहातून म्हणजे दारणा, कडवा, भाम, भावली, मुकणेमधून १६८ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. त्यांना पाणी वापरासाठी २८४ द.ल.घ.मी. प्रकल्पीय तरतूद आहे. पालखेड समूहातून म्हणजे वाघाड, करंजवण, ओझरवेअर, पालखेडमधून ५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. प्रकल्पीय तरतूद १२१ द.ल.घ.मी.ची आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीद्वारे पुढे आली आहे.