शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

६५ टक्क्यांपेक्षा अधिक साठ्यामुळे आता जायकवाडीला ‘वरचे’ पाणी नाही!

By admin | Updated: October 18, 2016 00:33 IST

औरंगाबाद :६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद : जायकवाडीत सध्या ८२ टक्केपाणीसाठा आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार जायकवाडीत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबरला पाण्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी समन्यायी पाणी वाटपाची बैठक गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात झाली. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने खरिपासाठी २० टीएमसी पाणी वापरले असल्याचेही या बैठकीद्वारे समोर आले. बैठकीला नाशिकचे मुख्य अभियंता एस. ए. वाघमारे, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मुख्य अभियंता अरुण कांबळे, प्रभारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ए. पी. कोहीकर, उपअधीक्षक अभियंता पी. पी. संत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड या पाच समूहातून एकूण ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या पाचही समूहातून प्रकल्पीय अहवालातील तरतुदीनुसार ८६० द.ल.घ.मी. पाणी उचलण्याची तरतूद आहे. यामध्ये मुळा समूहातून १५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यात सिंचनासाठी १३१ द.ल.घ.मी. आणि पिण्यासाठी १३.२९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे.या समूहातून प्रकल्पातील खरिपासाठीची वापराची तरतूद १७२ द.ल.घ.मी. इतकी आहे. प्रवरा समूहातून म्हणजे भंडारदरा व निळवंडेतून १४६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी प्रकल्पीय तरतूद २६० द.ल.घ.मी. इतकी आहे. गंगापूर समूहातून ४२ द.ल.घ.मी. पाणी वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. केवळ नाशिक शहरास पिण्यासाठी ३७.७ द.ल.घ.मी. तर औद्योगिक १.७ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. दारणा समूहातून म्हणजे दारणा, कडवा, भाम, भावली, मुकणेमधून १६८ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. त्यांना पाणी वापरासाठी २८४ द.ल.घ.मी. प्रकल्पीय तरतूद आहे. पालखेड समूहातून म्हणजे वाघाड, करंजवण, ओझरवेअर, पालखेडमधून ५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. प्रकल्पीय तरतूद १२१ द.ल.घ.मी.ची आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीद्वारे पुढे आली आहे.