शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जलयुक्त शिवार अभियानामुळे भू-जल साठ्यात वाढ होणार- लोणीकर

By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळीत वाढ होणार असून, जमिनीत पाणी मुरल्याने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होईल.

जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळीत वाढ होणार असून, जमिनीत पाणी मुरल्याने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.परतूर तालुक्यातील लोणी खु. येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट नाला बांध कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव सोळंके, तहसीलदार विनोद गुुंडमवार, चापते यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना लोणीकर म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असून, येणाऱ्या काळात वीज पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.या परिसराची पाणी पातळी खोली गेली असून, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून व इतर महत्त्वाकांक्षी योजनाच्या माध्यमातून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. लोणी खु. व परिसरात गेल्या वर्षी नालाखोलीकरण करण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात अशाच प्रकारच्या पाणी पातळीत वाढ घडून येणार असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला अनंतराव यादव, विनायकराव यादव, अंकुश यादव, माणिकराव राठोड, सुनील यादव, हरिभाऊ नागरे, गजानन यादव, भागवत कवडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.