शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

जलयुक्त शिवार अभियानामुळे भू-जल साठ्यात वाढ होणार- लोणीकर

By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST

जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळीत वाढ होणार असून, जमिनीत पाणी मुरल्याने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होईल.

जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळीत वाढ होणार असून, जमिनीत पाणी मुरल्याने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.परतूर तालुक्यातील लोणी खु. येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट नाला बांध कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव सोळंके, तहसीलदार विनोद गुुंडमवार, चापते यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना लोणीकर म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असून, येणाऱ्या काळात वीज पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.या परिसराची पाणी पातळी खोली गेली असून, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून व इतर महत्त्वाकांक्षी योजनाच्या माध्यमातून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. लोणी खु. व परिसरात गेल्या वर्षी नालाखोलीकरण करण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात अशाच प्रकारच्या पाणी पातळीत वाढ घडून येणार असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला अनंतराव यादव, विनायकराव यादव, अंकुश यादव, माणिकराव राठोड, सुनील यादव, हरिभाऊ नागरे, गजानन यादव, भागवत कवडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.