शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच

By admin | Updated: March 29, 2016 00:38 IST

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे.

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. आ. अर्जुन खोतकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट सोमवारी घेतली. त्यानंतर लोचन यांनी निविदा प्रक्रियेस मंजुरी दिली. या निर्णयाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.जालना शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जीर्ण झाल्याने तसेच नवीन वसाहतीतही जलवाहिनीअभावी पाणीप्रश्न बिकट झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून हे काम मंजूर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा करत या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याची योजना मंजूर करण्यात आलेली आहे. प्रारंभी १७७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. यात शहरात जलमापक बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने ही योजना १२७ कोटी ६५ लाख रुपयांवर मंजूर करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत शहरातील कादराबाद, रामनगर, चंदनझिरा, नुतन वसाहत, नागेवाडी, नॅशनलनगर, संभाजीनगर, बाजारवाडी (जुना जालना) या भागांत आठ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शहरात ३८१ कि़मी. लांबीची पाणी पुरवठा करणारी वाहिनी विविध भागांत अंथरण्यात येणार आहे. तर जलकुंभ ते अंतर्गत जलवाहिनी यांना जोडणारी ३० कि.मी. लांबीची मोठी जलवाहिनी बसविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत ४८ कोटी ४९ लाख २२ हजार रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया मंजुरीअभावी योजनेची अंमलबजावणी रखडली होती. यासाठी आ. अर्जुन खोतकर यांनी सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट घेऊन निविदा प्रक्रिया मंजूर करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर लोचन यांनी योजनेची परिपूर्ण माहिती घेत याची निविदा प्रक्रिया तात्काळ मंजूर केली. या निर्णयाने शहरातील अनेक वर्षापासून रखडलेला जलवाहिनीचा प्रश्न निकाली निघणार आहे. ही योजना मंजूर करण्यापासून ते निविदा प्रक्रियेपर्यंतच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घातले तर भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)