शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

अंतर्गत जलवाहिनीचे काम लवकरच

By admin | Updated: March 29, 2016 00:38 IST

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे.

जालना : शहरातील १२७ कोटी रुपये खर्चाच्या अंतर्गत जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेला नगर विकास विभागाने सोमवारी मंजुरी दिली असून, या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. आ. अर्जुन खोतकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट सोमवारी घेतली. त्यानंतर लोचन यांनी निविदा प्रक्रियेस मंजुरी दिली. या निर्णयाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.जालना शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जीर्ण झाल्याने तसेच नवीन वसाहतीतही जलवाहिनीअभावी पाणीप्रश्न बिकट झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून हे काम मंजूर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा करत या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याची योजना मंजूर करण्यात आलेली आहे. प्रारंभी १७७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. यात शहरात जलमापक बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने ही योजना १२७ कोटी ६५ लाख रुपयांवर मंजूर करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत शहरातील कादराबाद, रामनगर, चंदनझिरा, नुतन वसाहत, नागेवाडी, नॅशनलनगर, संभाजीनगर, बाजारवाडी (जुना जालना) या भागांत आठ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शहरात ३८१ कि़मी. लांबीची पाणी पुरवठा करणारी वाहिनी विविध भागांत अंथरण्यात येणार आहे. तर जलकुंभ ते अंतर्गत जलवाहिनी यांना जोडणारी ३० कि.मी. लांबीची मोठी जलवाहिनी बसविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत ४८ कोटी ४९ लाख २२ हजार रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया मंजुरीअभावी योजनेची अंमलबजावणी रखडली होती. यासाठी आ. अर्जुन खोतकर यांनी सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव निता राजू लोचन यांची भेट घेऊन निविदा प्रक्रिया मंजूर करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर लोचन यांनी योजनेची परिपूर्ण माहिती घेत याची निविदा प्रक्रिया तात्काळ मंजूर केली. या निर्णयाने शहरातील अनेक वर्षापासून रखडलेला जलवाहिनीचा प्रश्न निकाली निघणार आहे. ही योजना मंजूर करण्यापासून ते निविदा प्रक्रियेपर्यंतच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घातले तर भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि आ. अर्जुन खोतकर यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)