शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शासनाकडून वाळूजवर अन्याय!

By admin | Updated: July 17, 2014 01:36 IST

औरंगाबाद : शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळूज औद्योगिक परिसिराचा झपाट्याने विकास होत आहे.

औरंगाबाद : शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळूज औद्योगिक परिसिराचा झपाट्याने विकास होत आहे. या भागाची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे. मोठ्या ग्रामपंचायतींना एकत्र करून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी, अशी मागणी दहा वर्षांपासून नागरिक करीत आहेत. मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्यांचा आहे. रोजगारनिर्मितीमुळे वाळूज भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाढती लोकसंख्या छोट्या ग्रामपंचायतींसाठी डोकेदु:खी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांना सेवा- सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायती अपयशी ठरत आहेत. वाळूजला स्वतंत्र नगर परिषद अथवा प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. नगर परिषदांचे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर केले जाते. त्यात अ, ब, क आणि ड वर्ग, असे वर्गीकरण आहे.नगर परिषदेसाठी किमान तीस हजारांहून अधिक लोकसंख्येची गरज असते. वाळूज भागातील एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० हजारांहून अधिक येते. त्यामुळे या भागात अ वर्गातील नगर परिषद स्थापन करण्यात यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.वाळूज भागात सुमारे २२ पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत. यातील मोठ्या ग्रामपंचायती फक्त कर वसुली करतात. सुविधा काहीच देत नाहीत, अशी उद्योजकांची ओरड आहे.या भागात स्वतंत्र नगर परिषद अथवा विकास प्राधिकरण स्थापन केल्यास उद्योजकांचे विविध प्रश्न सुटतील. उद्योजकांना कर कोणालाही द्यावाच लागतो. या भागातील विकासकामांसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे उद्योजकांना वाटते.वाळूज परिसरातील लहान- मोठ्या गावांची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिकडेतिकडे कचऱ्याचे ढीग, उघड्या नाल्या, नाल्यांवरच घाण, असे विदारक चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. रांजणगाव हा सर्वांत मोठा परिसर; पण या गावातील विविध मुख्य रस्ता सोडला तर अंतर्गत रस्ते बरेच खराब आहेत. अनेक वसाहतींमध्ये पथदिवेच नाहीत. बजाजनगरचीही परिस्थिती खूप चांगली नाही.२०० खाटांचे रुग्णालय द्यावाळूज परिसरातील लहान- मोठ्या आरोग्यसेवांसाठी नागरिकांना थेट औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. रात्री- अपरात्री शहरात जाणे कोणालाही परवडत नाही. शासनाने चिकलठाणा भागात २०० खाटांचे एक स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर वाळूज परिसरातही २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.पाठपुरावा सुरूच आहेऔरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. संजय शिरसाट म्हणाले की, या भागात नगर परिषद, रुग्णालय स्थापन करण्यासाठी शासनाकडे आम्ही वारंवार प्रयत्न करीत आहोत.