शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

घुसखोरांना हाकलण्याचे संकट

By admin | Updated: September 12, 2014 00:31 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध वसतिगृहांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक तरुणांनी घुसखोरी केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध वसतिगृहांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक तरुणांनी घुसखोरी केली आहे. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रवेश मिळाल्यानंतरही वसतिगृहात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, वसतिगृहांमध्ये बेकायदेशीर राहत असलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण संचालक, वसतिगृह अधीक्षक व अन्य प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरली आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी उद्या सकाळी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या बेकयदेशीर तरुणांचे लक्ष लागलेले आहे. यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठात एकूण १० वसतिगृहे आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहा, तर विद्यार्थिनींच्या ४ वसतिगृहांचा समावेश आहे. यापैकी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह, एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह व विद्यार्थी विश्रामगृह यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी राहत आहेत. शैक्षणिक कालावधी संपला तरी ते विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर निघत नाहीत. अनेक जण तर काही महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे कंत्राटी प्राध्यापक आहेत. याशिवाय काही संशोधक विद्यार्थी हे संशोधनाचा कालावधी संपला तरी ते विभागप्रमुख किंवा मार्गदर्शकांकडून संशोधनासाठी अर्जाद्वारे कालावधी वाढवून घेतात व त्याआधारे ते वसतिगृहातच राहत आहेत. काही जण नेट-सेटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. वसतिगृहांमध्ये नियमबाह्य राहणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अनेक गरजू विद्यार्थी हे नियमांनुसार प्रवेश मिळाल्यानंतरही वसतिगृहापासून वंचित आहेत. काही विद्यार्थ्यांना तर चक्क धमकावले जात आहे. वसतिगृहांमध्ये कसलीही शिस्त नाही. मागील दोन वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क माफ केले आहे. त्यामुळे वसतिगृहातील घुसखोरीचा पेच निर्माण झाल्याचे बोलले जाते.