शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

तब्बल अडीच वर्षांनंतर कळाले अपात्र उमेदवार

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सहायक कुलसचिवाच्या ४ जागांपैकी खुल्या प्रवर्गातून २ पुरुष व १ महिला, तर विमुक्त भटक्या जमातीच्या १ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते

औरंगाबाद : सहायक कुलसचिवाच्या ४ जागांपैकी खुल्या प्रवर्गातून २ पुरुष व १ महिला, तर विमुक्त भटक्या जमातीच्या १ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी खुल्या प्रवर्गातून ४९ व विमुक्त भटक्या प्रवर्गातून १५ उमेदवारांनी अर्ज केले होते. या दोन्ही पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभवाची खातरजमा न करता विद्यापीठ प्रशासनाने या सर्व उमेदवारांची २० नोव्हेंबर २०१३ रोजी लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर २३ व २४ डिसेंबर २०१३ रोजी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा त्यातील काही उमेदवारांनी मुलाखत कार्यक्रमावरच आक्षेप घेतला. त्यामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित केला. त्यामुळे काही जणांनी न्यायालयात धाव घेतली. महिनाभरापूर्वी न्यायालयाने निर्णय दिला की, एकतर ही जाहिरातच रद्द करावी किंवा दोन्ही पदांसाठी प्राप्त अर्जांची सक्षम छाननी समितीमार्फत पडताळणी करावी. जे पात्र उमेदवार असतील त्यांच्या मुलाखती घेतल्या जाव्यात. त्यानुसार विद्यमान कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या आदेशानुसार विद्यापीठ प्रशासन प्रमुख कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी आज २४ व उद्या २५ नोव्हेंबर रोजी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. साधना पांडे, डॉ. सतीश पाटील यांची एक सक्षम छाननी समिती स्थापन केली. छाननी समितीने आज सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत उपकुलसचिव पदासाठी प्राप्त सर्व अर्जांची छाननी केली, तेव्हा या पदासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचा अभिप्राय कुलगुरूंना दिला. दुसरीकडे मुलाखत समितीचे सचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव, राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण, शासनाचे प्रतिनिधी डॉ. गुप्ता हे मुलाखतीसाठी विद्यापीठात उमेदवारांची प्रतीक्षा करीत बसले होते.तेव्हा कुलगुरू डॉ. चोपडे यांनी उपकुलसचिव पदासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचे सांगून आजच्या मुलाखती रद्द केल्या. त्यामुळे मुलाखत समितीमधील सदस्यांना दुपारी १.३० वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले.