शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

उद्योगांना पाणी मिळेना !

By admin | Updated: February 3, 2015 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना स्टील उद्योगाचे जाळे देशभर पसरविणाऱ्या शहरातील औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी शेंद्रा-जालना ही स्वतंत्र पाणीपुरवठा करून देखील नियमित पाणी मिळत

संजय कुलकर्णी , जालनास्टील उद्योगाचे जाळे देशभर पसरविणाऱ्या शहरातील औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी शेंद्रा-जालना ही स्वतंत्र पाणीपुरवठा करून देखील नियमित पाणी मिळत नसल्याने त्याचा उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत छोटे-मोठे सुमारे १५० उद्योग आहेत. मात्र त्यापैकी सर्वसाधारणपणे १०० कारखाने सुरू असून त्यात सर्वाधिक ५५ कारखाने स्टील उद्योगाचे आहेत. या उद्योगाला पाणी मिळावे, यासाठी शेंद्रा-जालना या पाणीपुरवठा योजनेची निर्मिती झाली. किमान २ एम.एल.डी. पाणी या योजनेतून दररोज अपेक्षित आहे. परंतु ज्यावेळी पाणीपुरवठा होतो, त्यावेळी एक किंवा सव्वा एमएलडी पाणी येते. नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे उद्योजकांना पाणी विकत घ्यावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात उद्योजकांची मोठी अडचण होते. कारण एकतर या काळात पाणी अधिक लागते. विकतचे पाणी देखील लवकर मिळत नाही. या योजनेद्वारे पाणी केव्हा मिळेल, हे निश्चित नाही. अनेकवेळा तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा होत नाही. छोट्या उद्योगांना तर अनेकवेळा उद्योग बंद ठेवावे लागतात. गेल्या महिनाभरापासून या उद्योगांना पाणी मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. पाणी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा येते, अशी स्थिती आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर मंदी, वीज दरवाढीपाठोपाठ आता पाणीटंचाईचे नवे संकट उभे राहिले आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अजय किंगरे म्हणाले, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील मुख्य व्हॉलच्या नादुरूस्तीमुळे अनिमियत पाणीपुरवठा होत आहे. ५ ते ७ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. २ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी पाणी येते. त्यामुळे उद्योगांना पाणी मिळत नाही.मंदी आणि वीज दरवाढ यामुळे अगोदरच कारखानदार अडचणीत सापडले आहेत. सुमारे ४० स्टील कारखान्यांमध्ये केवळ रात्रपाळीतच काम सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून असंख्य कामगार आपल्या गावी निघून गेले असून उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नेहमी गजबजलेला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आता शुकशुकाट निर्माण झाला आहे.याबाबत किशोर अग्रवाल म्हणाले, आमच्या उद्योगांना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला पाणी विकतच घ्यावे लागते. येथील उद्योगांसाठी किमान ३ एमएलडी पाणी दररोज लागते. परंतु अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे पाणी आले नसल्याचे सांगण्यात येते. ४सतीश अग्रवाल म्हणाले, शेंद्रा-जालना योजनेतून महिन्यातून एकदा पाणी येते. पाण्याच्या सुविधेसाठी स्वतंत्र योजना केलेली असताना पाण्याविना उद्योगांची मोठी अडचण होत आहे. आम्हाला विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.