शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

उद्योगांना पाणी मिळेना !

By admin | Updated: February 3, 2015 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना स्टील उद्योगाचे जाळे देशभर पसरविणाऱ्या शहरातील औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी शेंद्रा-जालना ही स्वतंत्र पाणीपुरवठा करून देखील नियमित पाणी मिळत

संजय कुलकर्णी , जालनास्टील उद्योगाचे जाळे देशभर पसरविणाऱ्या शहरातील औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी शेंद्रा-जालना ही स्वतंत्र पाणीपुरवठा करून देखील नियमित पाणी मिळत नसल्याने त्याचा उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत छोटे-मोठे सुमारे १५० उद्योग आहेत. मात्र त्यापैकी सर्वसाधारणपणे १०० कारखाने सुरू असून त्यात सर्वाधिक ५५ कारखाने स्टील उद्योगाचे आहेत. या उद्योगाला पाणी मिळावे, यासाठी शेंद्रा-जालना या पाणीपुरवठा योजनेची निर्मिती झाली. किमान २ एम.एल.डी. पाणी या योजनेतून दररोज अपेक्षित आहे. परंतु ज्यावेळी पाणीपुरवठा होतो, त्यावेळी एक किंवा सव्वा एमएलडी पाणी येते. नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे उद्योजकांना पाणी विकत घ्यावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात उद्योजकांची मोठी अडचण होते. कारण एकतर या काळात पाणी अधिक लागते. विकतचे पाणी देखील लवकर मिळत नाही. या योजनेद्वारे पाणी केव्हा मिळेल, हे निश्चित नाही. अनेकवेळा तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा होत नाही. छोट्या उद्योगांना तर अनेकवेळा उद्योग बंद ठेवावे लागतात. गेल्या महिनाभरापासून या उद्योगांना पाणी मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. पाणी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा येते, अशी स्थिती आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर मंदी, वीज दरवाढीपाठोपाठ आता पाणीटंचाईचे नवे संकट उभे राहिले आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अजय किंगरे म्हणाले, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील मुख्य व्हॉलच्या नादुरूस्तीमुळे अनिमियत पाणीपुरवठा होत आहे. ५ ते ७ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. २ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी पाणी येते. त्यामुळे उद्योगांना पाणी मिळत नाही.मंदी आणि वीज दरवाढ यामुळे अगोदरच कारखानदार अडचणीत सापडले आहेत. सुमारे ४० स्टील कारखान्यांमध्ये केवळ रात्रपाळीतच काम सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून असंख्य कामगार आपल्या गावी निघून गेले असून उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नेहमी गजबजलेला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आता शुकशुकाट निर्माण झाला आहे.याबाबत किशोर अग्रवाल म्हणाले, आमच्या उद्योगांना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला पाणी विकतच घ्यावे लागते. येथील उद्योगांसाठी किमान ३ एमएलडी पाणी दररोज लागते. परंतु अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे पाणी आले नसल्याचे सांगण्यात येते. ४सतीश अग्रवाल म्हणाले, शेंद्रा-जालना योजनेतून महिन्यातून एकदा पाणी येते. पाण्याच्या सुविधेसाठी स्वतंत्र योजना केलेली असताना पाण्याविना उद्योगांची मोठी अडचण होत आहे. आम्हाला विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.