शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सार्वजनिक क्षेत्रातील बँका जगल्या तर अर्थव्यवस्था जगेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:02 IST

देविदास तुळजापूरकर (जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन) १९ जुलै रोजी बँक राष्ट्रीयीकरणाचा ५२ वा वर्धापन ...

देविदास तुळजापूरकर

(जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन)

१९ जुलै रोजी बँक राष्ट्रीयीकरणाचा ५२ वा वर्धापन दिन होता. याच औचित्यावर केंद्र सरकारने आत्मनिर्भरतेच्या नावाखाली आयडीबीआय आणि सार्वजनिक क्षेत्रातील अन्य दोन बँकांच्या खासगीकरणाची केलेली घोषणा अमलात आणण्यासाठी लोकसभेत बँक राष्ट्रीयीकरण कायद्यात दुरुस्ती मंजूर करून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत होते. सामान्यांची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था जगविण्यासाठी सरकारी बँका जगल्या पाहिजेत. या बँका जगल्या तर अर्थव्यवस्था जगेल आणि देश जगेल. हा विचार करून सर्व राजकीय पक्षांनी अभिनिवेश दूर सारत सामान्य माणसांचं हित डोळ्यांसमोर ठेवून बँक राष्ट्रीयीकरणाच्या बाजूने उभे राहावे आणि प्रयत्न हाणून पाडायला हवा.

खासगी बँकांचा पूर्वेतिहास लक्षात घेता, सामान्य माणसाने घाम गाळून बँकेत जमा केलेली त्याची बचत असुरक्षित बनेल. नफा/तोट्याचे गणित मांडत बँका खेडेगाव आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातून काढता पाय घेतील. शेती, लघु उद्योग, शैक्षणिक कर्ज यांना देण्यात येणाऱ्या कर्जात लक्षणीय घट होईल, याउलट मोठ्या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जात वाढ होईल. बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा शुल्कांत जबर वाढ केली जाईल. बँकांतून कायमस्वरूपी रोजगार कमी होतील आणि कंत्राटी नोकर भरती केली जाईल. जनतेच्या बचतीवर मोठ्या उद्योगांचे नियंत्रण येईल. सामान्य माणूस खासगी बँकांसाठी दखलपात्र राहणार नाही.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ९७ टक्के जनधनाची आणि ९८ टक्के पेन्शन खाती आहेत. सामाजिक सुरक्षितता विमा योजना, प्रधान मंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेत सार्वजनिक बँकांचा ९८ टक्के वाटा आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजनेत ८० टक्के, शैक्षणिक कर्ज योजनेत ८० टक्के, फेरीवाल्यांसाठीच्या स्वनिधी योजनेत ९८ टक्के तर पीक कर्ज योजनेत ९५ टक्के हिस्सा सार्वजनिक बँकांचा आहे. आपत्कालीन परिस्थितीत लघु आणि मध्यम उद्योगांना वाटप करण्यात येणारी २० टक्के तातडीची मदत कर्ज योजनेचे ९० टक्के काम याच बँका करतात. ही आकडेवारी खूप बोलकी आहे. जिथे, जिथे सामान्य माणसाचे बँकिंग आहे तिथे तिथे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. अशा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण हे सरकार करू पाहत आहे.

यावर्षी दोन बँका वगळता सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका नफ्यात आहेत. त्या थकीत कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदींमुळे, तसेच थकीत कर्ज राइट ऑफ केल्यामुळे. या थकीत कर्जाची वसुली केली गेली तर या बँका सरकारला चांगला नफा मिळवून देऊ शकतात. हेतुतः कर्ज बुडविणे फौजदारी गुन्हा ठरवावा, निवडणूक आचारसंहितेत सुधारणा करून मुद्दामहून कर्ज थकविणाऱ्यांना निवडणूक लढविण्यास मनाई करावी, असे आमचे सरकारला आवाहन आहे.