शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

निकालासाठी ‘आई’ ठरली ‘पासवर्ड’

By admin | Updated: June 18, 2014 01:40 IST

सोमनाथ खताळ , बीड दहावी-बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉर्इंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सूकता कोणाला असणार नाही?

सोमनाथ खताळ , बीडदहावी-बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉर्इंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सूकता कोणाला असणार नाही? परंतू आॅनलाईन निकाल प्रक्रियेत एका क्लिकआड दडलेले यशापयश जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या नावाचा पासवर्ड वापरावा लागला.निकाल जाणून घेताना संगणकीकृत पद्धतीच्या वापरामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने लढविलेली ही शक्कल बऱ्याच अंशी यशस्वी ठरली. इतकेच नव्हे तर यामुळे यशाप्राप्तीतही मुलांना आईचे विस्मरण झाले नाही आणि अपयशामुळेच खचलेल्या आईच्या नावामुळे अप्रत्यक्ष बळही मिळाले.नुकतेच दहावी-बारावीचे निकाल आॅनलाईन जाहीर झाले. संगणकावर केंद्र क्रमांक आणि रोल नंबर टाकुन कोणालाही कुणाचा निकाल आतापर्यंत पहाता येत होता. त्यामुळे या पद्धतीचा गैरवापर सर्रास होत असल्याचे शिक्षण मंडळाच्या लक्षात आले होते. ही पद्धत गैरसोयीची आणि पुरेशी पारदर्शक नसल्याचे स्पष्ट झाल्याने या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार मंडळाने केला. त्यानुसार यंदाच्या वर्षापासून आॅनलाईन निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्याला पासवर्ड म्हणून स्वत:च्या आईचे नाव टाकणे बंधनकारक करण्यात आले. आईचे नाव संगणकाने ग्राह्य धरल्यानंतरच निकाल विद्यार्थ्यांना बघण्यासाठी मिळाला. या नव्या उपक्रमामुळे निकाल बघताना होणाऱ्या गैरव्यवहारांना तर आळा बसलाच पण मुलांनाही आईचे नावाचे महत्व कळाले.विद्यार्थ्यांच्या जीवनात बारावी परीक्षेचे असलेले महत्व लक्षात घेता यशाच्या पायरीवर चढताना विद्यार्थ्यांना आपल्या आईची कायम आठवण रहावी, ही कल्पकता शिक्षण मंडळाने याच्या माध्यमातून दाखविली आहे. शिक्षण मंडळातर्फे वेबसाईटवर निकाल पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईचा नावाच्या पासवर्डचा वापर करूनच यशापयशापर्यंत पोहंचता आले.या पद्धतीचा वापर करण्यासाठी शिक्षण मंडळाने निकालासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला. शिक्षण मंडळाचा हा प्रयोग बऱ्याचा अंशी यशस्वी ठरला. शिक्षण मंडळाने आईच्या नावाचा अशा कल्पक पद्धतीने वापर करून विद्यार्थ्याला आईची आठवण पासवर्डच्या रूपाने अनिवार्य करून एक आदर्श प्रस्तुत केला आहे.आईचा खऱ्या अर्थाने सन्मानबारावीच्या निकालात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शिक्षण मंडळाने केला आहे. पासवर्ड म्हणून आईचे नाव अनिवार्य केल्याने एरव्ही महाविद्यालयीन जीवनात केवळ वडीलांच्याच नावाचा वापर करण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना आता काहीतरी प्रक्रिया म्हणून का होईना आईचे नाव वापरावेच लागेल, अशी प्रतिक्रिया चिंचाळ येथील अशोक माध्यमिक विद्यालयातील उपप्राचार्य सुशांत काळे यांनी व्यक्त केली.