शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘आधार’साठी प्रति व्यक्ती शंभर रुपयांत घरपोच सेवा

By admin | Updated: August 9, 2015 00:29 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांना सर्व कागदपत्रे तात्काळ मिळावीत या दृष्टीकोनातून जिल्हाभरात ३४० महा ई-सेवा केंद्राची स्थापना करुन २९६ केंद्रांना मान्यता देण्यात आली़

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांना सर्व कागदपत्रे तात्काळ मिळावीत या दृष्टीकोनातून जिल्हाभरात ३४० महा ई-सेवा केंद्राची स्थापना करुन २९६ केंद्रांना मान्यता देण्यात आली़ परंतू यापैकी प्रत्यक्षात १६३ केंद्रच सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने सेवा कर वसूल करण्याची प्रक्रिया या केंद्रामार्फत सुरु झाली़ केंद्रांनी विविध प्रमाणपत्र देण्याची जागा बदलली़ अन् घरपोच आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरु करुन प्रति १०० रुपये कार्ड प्रमाणे वसुली सुरुच ठेवली असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे़ त्यामुळे महा ई-सेवा केंद्राविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़ महा ई-सेवा केंद्रातून सातबारा, ८ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र, रहिवाशी, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिलिअर, राजपत्रातील नाव बदलणे, आॅनलाईन रेल्वे बुकींग यासह ६३ प्रकारच्या शासकीय सेवा व इतर सेवा अशा एकूण ३६० सेवा नागरिकांना देण्याचे काम या महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे़ प्रत्येक प्रमाणपत्रासाठी दुपटीचा सेवाकर घेऊन विविध प्रमाणपत्र दिली जात आहेत़ शासनाने दिलेल्या नाममात्र शुल्काव्यतिरिक्त दुपटीचे सेवा कर महा ई-सेवा केंद्राकडून घेतली जात असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़ आधारकार्डसाठी ५० रुपये, १०० रुपये असे चार्ज घेतले जात असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी मुरुड-अकोला येथील महा ई-सेवा केंद्रावर कारवाई करुन हे केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात आले़ लातूर जिल्ह्यातील ३४० महा ई-सेवा केंद्रांपैकी १६३ केंद्र सुरु आहेत़ तर इतर १७६ केंद्र जिल्हा प्रशासनाने सुचित केलेल्या नियमानुसार न चालविल्याने बंद करण्यात आली आहे़ तर इतर महा ई-सेवा केंद्रातील केंद्र प्रमुख इतरत्र शासकीय-निमशासकीय सेवेत नोकरीस लागल्याने जिल्ह्यातील ४९ केंद्र बंद करण्यात आली आहेत़ परिणामी, मोजक्याच केंद्रांवर कारभार चालू असल्याने नागरिकांची लूट वाढली असल्याचे दिसून येत आहे़महा ई-सेवा केंद्राचा हा गोरखधंदा कायम सुरुच आहे़ सकाळच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ३९ कॅम्पच्या माध्यमातूून ० ते ५ वयोगटातील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरु आहे़ सकाळी १० ते ३ च्या दरम्यान कॅम्प घेऊन उर्वरीत वेळेमध्ये घरपोच सेवेतून आधारच्या नावाखाली लूट सुरु असल्याचे समोर आले आहे़ पालक दिवसभर रांगेत थांबून थकल्यावर त्यांना हा घरपोच सेवेचा सल्ला दिला जातो़