शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

मानवी साखळी उत्साहात

By admin | Updated: August 6, 2014 02:35 IST

औरंगाबाद : येथील एडीसीएच्या मैदानावर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) केंद्र औरंगाबादेत व्हावे यासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरने (सीएमआयए) पुढाकार घेतला असून, आज दुपारी सिडको एन-२ येथील एडीसीएच्या मैदानावर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भरपावसातही अभियांत्रिकी आणि मॅनेजमेंटच्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हजेरी लावली.राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते मानवी साखळीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘आयआयएम’सारखी संस्था ऐतिहासिक औरंगाबाद शहरात यावी म्हणून आपण वैयक्तिकरीत्याही प्रयत्न करीत आहोत. शासनाने हे केंद्र औरंगाबादला द्यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असतानाही एडीसीएच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. पावसात भिजत तरुणाईने जोरजोरात घोषणा दिल्या. ‘आयआयएम औरंगाबाद’ या घोषणेने मैदान दणाणून सोडण्यात आले होते. हातात झेंडे घेऊन तरुण-तरुणी डोलत होते. एडीसीएच्या मैदानावर देशभक्तीवर आधारित गाणीही वाजविण्यात येत होती. शेवटी राष्ट्रगीताने मानवी साखळीचा समारोप करण्यात आला. मानवी साखळीच्या उपक्रमाला औद्योगिक व इतर १४ संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा, माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, मासीआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एच.एम. देसरडा, प्रशांत देशपांडे, मिलिंद कंक, रितेश मित्रा, डॉ. गौतम शहा, क्रेडाईचे बाळकृष्ण भाकरे, राठी, अ‍ॅड. वसंत देशमुख यांच्यासह काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते.