शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
4
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
5
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
6
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
7
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
8
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
9
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
10
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
11
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
12
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
13
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
14
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
15
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
16
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
17
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
18
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
19
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
20
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...

गडदगड प्रकल्पात साडेनऊ टक्के पाणी

By admin | Updated: July 26, 2014 01:11 IST

नागद : येथील गडदगड मध्यम प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा झाला असून दोन दिवसांच्या पावसामुळे ही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता.

नागद : येथील गडदगड मध्यम प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा झाला असून दोन दिवसांच्या पावसामुळे ही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. त्यानंतर उपसा झाल्याने उन्हाळ्यात प्रकल्पात अवघे ४ टक्के पाणी शिल्लक राहिले होते. यामुळे नागद व परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. जून महिन्यात फक्त ३० मि.मी. पाऊस झाल्याने ही चिंता अधिकच वाढली आहे. जुलै महिन्यात २४ तारखेपर्यंत १३० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागात झाली आहे. या पावसामुळे प्रकल्पाची पाणीपातळी साडेनऊ टक्क्यापर्यंत गेली आहे, एवढाच काय तो दिलासा शेतकरी व गावकऱ्यांना मिळाला आहे.शाखा अभियंता के. जी. गोरे, डी. पी. सूर्यवंशी, रमेश कुंभे, महादू महाजन आदींनी धरणाची पाहणी केली. गडदगड नदीतून सायगव्हाण गावाजवळ दुसरीकडे जाणारे पाणी बंद करून गडदगड धरणातच पाणी येऊ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून फक्त वापरण्यासाठीच ग्रामपंचायत नागदला पाणीपुरवठा करीत असल्याने पिण्याचे पाणी गावाबाहेरून आणावे लागत आहे. प्रकल्पात पाणी वाढल्याने पिण्याचे पाणी मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.उंडणगाव परिसरात पिके पिवळी पडू लागलीउंडणगाव : जोरदार वाऱ्यासह पडलेल्या भिजपावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारनंतर जोराचे वारे होते. या वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांची पडझड तर झालीच; शेतातही मका व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ठिबक सिंचनवरील कापसाची अनेक झाडे सुकत असून, कोवळा मका पिवळा पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश उगले यांनी सांगितले की, हवामानातील अचानक बदलामुळे असे प्रकार होत असून, याचा प्रतिबंध करण्यासाठी एक किलो युरिया व एक किलो पोटॅशचे पाणी करून एक एकर क्षेत्रातील कापूस पिकास याची आळवणी (ड्रिचिंग) करावी. तसेच एक किलो युरिया व एक किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात कालवून मका पिकास एक एकर क्षेत्रात द्यावे.