शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आरोग्य विभाग खडबडून जागा

By admin | Updated: November 4, 2014 01:36 IST

अंबड : अंबड तालुक्यात डेंग्युसह साथ रोगांच्या थैमानाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.

अंबड : अंबड तालुक्यात डेंग्युसह साथ रोगांच्या थैमानाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.एस. भटकर जातीने लक्ष देत असून बुधवार ५ नोव्हेंबर रोजी अंबड पंचायत समिती सभागृहात भटकर यांच्यासह जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामसेवकांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.तालुक्यात डेंग्यूसह साथ रोगांनी अक्षरश: थैमान घातले आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून साथ रोगांच्या वाढत्या प्रसाराने नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यात मागील महिन्यात भीमा पुंड (३०), मिलींद बिन्नीवाले (१६), अनिता मुळे (८), गणेश देविदास जराड (२२), संभाजी शिंदे (१८), आवेश बागवान (१८), सुदाम आरसुळ (१३), ऋषी खाडे (५) आदींसह अनेक रुग्ण डेंग्यूने बाधित झाले आहेत. यापैकी अनेकांवर सध्या अंबड, जालना व औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या नियोजन शुन्य काराभारामुळे सामान्य नागरिकांना नाहक मानसिक , शारीरिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. डेंग्यूने बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करताना २० हजारांपासून ६० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. एवढया मोठया प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसून रुग्णांस शारीरिक कष्ट सहन करावे लागतात ते वेगळेच. (वार्ताहर)