शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : कधी आभाळाची साद, कधी मातीची हाक, कधी प्रियेच्या डोळ्यातलं हळवं स्वप्न, तर कधी बळीराजाची तापल्या उन्हातली अखंड वणवण.

औरंगाबाद : कधी आभाळाची साद, कधी मातीची हाक, कधी प्रियेच्या डोळ्यातलं हळवं स्वप्न, तर कधी बळीराजाची तापल्या उन्हातली अखंड वणवण... लोकशाहीतील विरोधाभास, राजकारणातील सत्तास्पर्धा, विकासातला विनाश, त्यात हरवलेली जनसामान्यांची व्यथावेदना... आशयघन शब्दपेरणीतून उगवलेल्या हिरव्यागार कवितांनी श्रोत्यांना हसवले, हलवले अन् अंतर्मुखही केले. निमित्त होते ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कविसंमेलनाचे. गुलाबी थंडीत रंगलेल्या संध्येला औरंगाबादकरांनी भरभरून उपस्थिती लावली.‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी कवींसह मान्यवरांचे स्वागत केले. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन, चक्रधर दळवी, लोकमान्य चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रा. ॠषिकेश कांबळे, प्रा. क्षमा खोब्रागडे, मनपा आयुक्त प्रकाश महाजन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच ‘दाद देण्या-घेण्याचा व्यवहार आता मुक्तपणे होऊ द्या’ असे आवाहन करत म्हात्रे यांनी तरुण कवी इंद्रजित घुले यांना कविता वाचण्यास निमंत्रित केले. प्रेमभंगाचे दु:ख मिश्कीलपणे मांडणाऱ्या त्यांच्या, दिल्या शब्दाला जागलं पाहिजेप्रेम तिच्यावर करायचंघराभोवती फिरायचंअन् एखाद्या दिवशी तिच्याच मुलाने मला मामा म्हणायचं’या ओळींनी मनसोक्त हसवले. त्यानंतर आलेल्या तुकाराम धांडे या कवीने मात्र, संतश्रेष्ठ तुकोबा आणि त्याचे सामान्य आजोबा यांच्यातल्या जुन्या स्नेहबंधाचे आदिवासी बोलीतून भव्य दर्शन घडवले. जगा आणि जगू द्या हा साधा मंत्र सांगत जगायला शिकवणारे तुकोबा आणि आजोबा एकाच मानवी वंशातले होते, ही त्यांची कल्पना दाद मिळवून गेली. पाकिस्तानातील शाळकरी मुलांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचे शब्दचित्र ‘दहशतीच्या जंगलाचे नाव पाकिस्तान आहे’ या कवितेतून साकारले. चेहरा पाहून सांगा हे कसे मी ओळखावे, कोणता माणूस आहे कोणता सैतान आहे?हा प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करून गेला. आजोबा झाल्यानंतर नातवाशी असलेले सुंदर नाते उलगडणारे त्यांचे गाणे प्रत्येकाच्या ओठात बसले. प्रा. सुरेश शिंदे यांनी शेतीमातीतल्या अस्सल प्रतिमा वापरत शिक्षण व्यवस्थेतील नकोशा संक्रमणावर कोरडे ओढले. ‘आभाळाच्या पाटीवर तू चांदण्यांचं पीक घे; पण भूक लागल्यावर भाकरीसाठी गावाकडच्या घरी ये’ आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणाला अशी साद घालत त्यांनी विचारात पाडले. मंगळवेढ्याच्या शिवाजी सातपुते यांनी खटकेबाज यमकांची आरास आणि वळणदार सादरीकरणातून भ्रष्ट व्यवस्थेचा मर्मभेदी पट मांडला. ‘तुमच्यासाठी कायपन’ व ‘करायचं काय?’ या त्यांच्या रचनांना वाहवा मिळाली. धांडे यांचे निसर्गकन्येच्या बोलीतले ‘पोर डोंगरावं भाळली...’ हे डोंगराचं गाणं रसिकांना रानावनात घेऊन गेले. ४मालवणी बोलीचा साज मिरवणारे डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, वैदर्भीय बोली उलगडणारे तुकाराम धांडे, प्रेमभंगाचे दु:ख मांडणारा इंद्रजित घुले, गेय कवितांमधून दाद घेणारे योगीराज माने, शेतीमातीचा गंध जपणारे प्रा. सुरेश शिंदे, यमकांमधून मर्म टिपणारे शिवाजी सातपुते व अस्सल वेदनेची बोली बोलणारे भरत दौंडकर यांनी उत्स्फूर्त, प्रसन्न काव्यवाचनातून रसिकांची उत्कट दाद मिळविली.कळस चढवला तो कवी अरुण म्हात्रे यांच्या बहारदार निवेदनाने. प्रासंगिक किस्से, गाजलेल्या कवींच्या लकबी नेमक्या पकडत त्यांच्याच शैलीत सादर केलेल्या निवडक कविता, बेसावध क्षणी कवींना मारलेल्या कोपरखळ्या आणि मार्मिक शेरेबाजीतून त्यांनी विनोदाचा मळा फुलवला.