शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : कधी आभाळाची साद, कधी मातीची हाक, कधी प्रियेच्या डोळ्यातलं हळवं स्वप्न, तर कधी बळीराजाची तापल्या उन्हातली अखंड वणवण.

औरंगाबाद : कधी आभाळाची साद, कधी मातीची हाक, कधी प्रियेच्या डोळ्यातलं हळवं स्वप्न, तर कधी बळीराजाची तापल्या उन्हातली अखंड वणवण... लोकशाहीतील विरोधाभास, राजकारणातील सत्तास्पर्धा, विकासातला विनाश, त्यात हरवलेली जनसामान्यांची व्यथावेदना... आशयघन शब्दपेरणीतून उगवलेल्या हिरव्यागार कवितांनी श्रोत्यांना हसवले, हलवले अन् अंतर्मुखही केले. निमित्त होते ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कविसंमेलनाचे. गुलाबी थंडीत रंगलेल्या संध्येला औरंगाबादकरांनी भरभरून उपस्थिती लावली.‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी कवींसह मान्यवरांचे स्वागत केले. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन, चक्रधर दळवी, लोकमान्य चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रा. ॠषिकेश कांबळे, प्रा. क्षमा खोब्रागडे, मनपा आयुक्त प्रकाश महाजन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच ‘दाद देण्या-घेण्याचा व्यवहार आता मुक्तपणे होऊ द्या’ असे आवाहन करत म्हात्रे यांनी तरुण कवी इंद्रजित घुले यांना कविता वाचण्यास निमंत्रित केले. प्रेमभंगाचे दु:ख मिश्कीलपणे मांडणाऱ्या त्यांच्या, दिल्या शब्दाला जागलं पाहिजेप्रेम तिच्यावर करायचंघराभोवती फिरायचंअन् एखाद्या दिवशी तिच्याच मुलाने मला मामा म्हणायचं’या ओळींनी मनसोक्त हसवले. त्यानंतर आलेल्या तुकाराम धांडे या कवीने मात्र, संतश्रेष्ठ तुकोबा आणि त्याचे सामान्य आजोबा यांच्यातल्या जुन्या स्नेहबंधाचे आदिवासी बोलीतून भव्य दर्शन घडवले. जगा आणि जगू द्या हा साधा मंत्र सांगत जगायला शिकवणारे तुकोबा आणि आजोबा एकाच मानवी वंशातले होते, ही त्यांची कल्पना दाद मिळवून गेली. पाकिस्तानातील शाळकरी मुलांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचे शब्दचित्र ‘दहशतीच्या जंगलाचे नाव पाकिस्तान आहे’ या कवितेतून साकारले. चेहरा पाहून सांगा हे कसे मी ओळखावे, कोणता माणूस आहे कोणता सैतान आहे?हा प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करून गेला. आजोबा झाल्यानंतर नातवाशी असलेले सुंदर नाते उलगडणारे त्यांचे गाणे प्रत्येकाच्या ओठात बसले. प्रा. सुरेश शिंदे यांनी शेतीमातीतल्या अस्सल प्रतिमा वापरत शिक्षण व्यवस्थेतील नकोशा संक्रमणावर कोरडे ओढले. ‘आभाळाच्या पाटीवर तू चांदण्यांचं पीक घे; पण भूक लागल्यावर भाकरीसाठी गावाकडच्या घरी ये’ आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणाला अशी साद घालत त्यांनी विचारात पाडले. मंगळवेढ्याच्या शिवाजी सातपुते यांनी खटकेबाज यमकांची आरास आणि वळणदार सादरीकरणातून भ्रष्ट व्यवस्थेचा मर्मभेदी पट मांडला. ‘तुमच्यासाठी कायपन’ व ‘करायचं काय?’ या त्यांच्या रचनांना वाहवा मिळाली. धांडे यांचे निसर्गकन्येच्या बोलीतले ‘पोर डोंगरावं भाळली...’ हे डोंगराचं गाणं रसिकांना रानावनात घेऊन गेले. ४मालवणी बोलीचा साज मिरवणारे डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, वैदर्भीय बोली उलगडणारे तुकाराम धांडे, प्रेमभंगाचे दु:ख मांडणारा इंद्रजित घुले, गेय कवितांमधून दाद घेणारे योगीराज माने, शेतीमातीचा गंध जपणारे प्रा. सुरेश शिंदे, यमकांमधून मर्म टिपणारे शिवाजी सातपुते व अस्सल वेदनेची बोली बोलणारे भरत दौंडकर यांनी उत्स्फूर्त, प्रसन्न काव्यवाचनातून रसिकांची उत्कट दाद मिळविली.कळस चढवला तो कवी अरुण म्हात्रे यांच्या बहारदार निवेदनाने. प्रासंगिक किस्से, गाजलेल्या कवींच्या लकबी नेमक्या पकडत त्यांच्याच शैलीत सादर केलेल्या निवडक कविता, बेसावध क्षणी कवींना मारलेल्या कोपरखळ्या आणि मार्मिक शेरेबाजीतून त्यांनी विनोदाचा मळा फुलवला.