शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अर्धा किलो भाजी घेणारा पावशेरवर !

By admin | Updated: July 4, 2014 01:11 IST

एजाज पठाण , शिवना यंदाचा पावसाळा लांबल्याने दुष्काळाच्या भीतीपोटी शेतकरी, तसेच ग्राहकांनी येथील आठवडी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

एजाज पठाण , शिवनायंदाचा पावसाळा लांबल्याने दुष्काळाच्या भीतीपोटी शेतकरी, तसेच ग्राहकांनी येथील आठवडी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. प्रचंड गर्दीमुळे चालण्यास कठीण वाटणारा आठवडी बाजार चक्क सुनासुना होता. त्यात आलेले ग्राहकही नेहमीपेक्षा निम्मी खरेदीच करीत होते.येथील आठवडी बाजार प्रसिद्ध असून प्रचंड गर्दीमुळे चालणेही कठीण होते. गेल्या दोन आठवड्यांपासून मात्र चित्र पालटले आहे. शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी या बाजाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मेथी जुडी १०, टोमॅटो १० रुपये पाव, शेवगा २० रुपये पाव असे भाव होते, त्यामुळे जो ग्राहक अर्धा किलो खरेदी करीत असे तो पावकिलो भाजीच खरेदी करीत होता. दोन आठवड्यांपासून खर्च निघणे कठीण झाले असून नवीन भांड्यांची विक्री होत नाही किंवा जुनी मोडही मिळत नाही, असे भांडी विक्रेते संजय काळे म्हणाले. दर आठवड्यात शिवना ते सिल्लोड अशा दोन फेऱ्या व्हायच्या. आता एक फेरी होणेही कठीण झाले आहे. त्यामुळे २ हजार रुपयांचा होणारा व्यवसाय ८०० रुपयांवर आला आहे, असे काळी-पिवळी मालक मेराजखान यांनी सांगितले.व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया...या आठवड्यात तर आमचा केवळ ६० टक्के व्यवसाय झाला. बाजारात दरवेळी ८ ते १० हजारांचा व्यवसाय होतो. यावेळी मात्र २५०० ते २७०० रुपयांचाच व्यवसाय झाला, असे भाजीपाला व्यापारी अशोक केळोदे यांनी सांगितले. यापूर्वी आमचा २० ते ३० हजार रुपयांचा व्यवसाय होत होता तो आता एकदम ६ ते ७ हजार रुपयांवर आला. आमच्याकडे वह्या, पुस्तके, दप्तराचा एक लाख रुपयांचा माल पडून आहे, असे शालेय साहित्य विक्रेते आबेदमामू पटेवकर यांनी सांगितले.आमचा तीन ते चार हजारांचा व्यवसाय होत होता. आता तो केवळ ४०० ते ५०० रुपये एवढा होत आहे, असे कापड व्यापारी दिगंबर ढोले यांनी सांगितले. प्रत्येक बाजाराला आम्हाला ४०० ते ५०० रुपये खर्च येतो. यापूर्वी आमचा १० ते १२ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता; पण तो आता केवळ १००० ते १५०० रुपये होत आहे, असे शेव-चिवडा विक्रेते कैलास नेमाडे म्हणाले.पावसाळा सुरू होताच पावसाळी बुटांची मागणी वाढते, पण यंदा पाऊसच नसल्याने माल तसाच पडून आहे. शाळा सुरू झाल्या तरी व्यवसायात फरक पडला नाही. ८ ते १० हजार रुपये होणारा व्यवसाय २ ते ५ हजार रुपयांवर आल्याचे बूट-चप्पल विक्रेते कलीमभाई यांनी सांगितले.दुष्काळामुळे दुकानांसाठी असलेले ओटेही रिकामे होते. अनेक व्यापाऱ्यांनी येथे येण्या-जाण्याचा खर्चही निघत नसल्याची तक्रार केली.