शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

लोकसहभागातून सोडविला हंद्राळ गावचा पाणीप्रश्न

By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST

मारूती कदम ,उमरगा शासनाच्या कसल्याही निधीची अपेक्षा न करता तालुक्यातील हंद्राळ येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आपल्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

मारूती कदम ,उमरगाशासनाच्या कसल्याही निधीची अपेक्षा न करता तालुक्यातील हंद्राळ येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आपल्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.हंद्राळ गावाला निजाम राजवटीच्या संघर्षाचा इतिहास आहे. कर्नाटकाच्या सिमावर्ती भागातील एक हजार लोकसंख्येचं छोटसं गाव. निजाम राजवटीत या गावाला पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले होते. सदर गाव हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने विकासापासून पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता. शासनाच्या वतीने या गावाला जलस्वराजची योजना दिली होती. या योजनेच्या विहिरीला अपेक्षित पाणी नसल्याने या गावाचा पाणीप्रश्न कायम होता. चार वर्षापासून सातत्याने पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी एकत्रित येवून बैठक घेतली. बैठकीत गावाशेजारी असलेल्या दोन पाझर तलावातील गाळ शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय लोकसहभागातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. घरातील प्रत्येक माणूस तलावातील गाळ काढण्यासाठी सरसावला. दोन्ही तलावातील गेल्या अनेक वर्षापासून साचलेला गाळ काढून झाल्यावर या तलावात ग्रामस्थांच्या लोकसहभागातून विहीर खोदली असून मुबलक पाणीही लागले. एकेकाळी तलावात खड्डा खोदून खड्ड्यात झिरपणाऱ्या वाटी-वाटी पाण्यावर तहान भागविणाऱ्या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी येथील समाज विकास संस्थेचे भूमीपूत्र वाघ, विद्या वाघ, इंदूमती वडदरे, अ‍ॅड. स्मरणी बिडवे आदींसह कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.\गावची लोकसंख्या एक हजार असून, या गावात १२५ घरे आहेत. यापूर्वी गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी संपूर्ण गावात जलस्वराज योजनेंतर्गत पाईपलाईन करण्यात आली आहे. घराघरात घर तिथे नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोकवर्गणीतून पाणीपुरवठ्यासाठी कामगाराची नियुक्ती करण्यात आली आहे.एकेकाळी घागरभर पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करुन रोजगारावर पाणी सोडणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लोकसहभागातून मार्गी लागत असून, गावातील शेतकरी व शेतमजुरांना पाण्याची उपलब्धता झाल्याने व परिसरातील दोन्ही पाझर तलावातील ग्रामस्थांच्या सहभागातून गाळ काढण्यात आल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ तूर्त हटला असून, परिसरात असलेल्या विहिरी व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या शिवारातील ५० हेक्टर सिंचन क्षेत्र वाढल्याचेही सरपंच रमेश हत्तरगे यांनी सांगितले.ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणीपट्टीची रक्कम वेळेत भरणा करावी व गावात होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वितरणावर निगराणी ठेवण्यासाठी समाज विकास संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने सरोजा बिराजदार, सविता बडूरे, तानाजी बिराजदार, शहाजी कुंभार, यशवंत बिराजदार यांच्या समितीचे गठण करण्यात आले आहे.