शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

शासनाच्या दुट्टपी धोरणाचा फळबागांना बसणार फटका

By admin | Updated: March 5, 2015 00:00 IST

घनसावंगी : तालुक्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. मात्र कृषि विभागाने पुनरूज्जीवनासाठी फक्त १७५ हेक्टर क्षेत्राचाच लक्षांक दाखविला आहे

घनसावंगी : तालुक्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. मात्र कृषि विभागाने पुनरूज्जीवनासाठी फक्त १७५ हेक्टर क्षेत्राचाच लक्षांक दाखविला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३ हजार हेक्टरवरील बागायतदार शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याने त्यांच्या बांगाचे पुनरूज्जीवन धोक्यात येणार आहे.घनसावंगी तालुक्यातील ११७ गावांतील १७५ हेक्टरवरील शेतकऱ्यांनाच मदत देण्याचे कृषि विभागाने ठरविले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ३ हजार हेक्टरवरील बागायतदार शेतकऱ्यांना फळबागा पुनरूज्जीवनाचा फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांच्या बागा धोक्यात आलेल्या आहे. दुष्काळामुळे खरीप व रबीचे पीक हातचे गेलेले असतानाच फळबागा वाचवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.तालुक्याला १७५ हेक्टरचा लक्षांक दिल्याने यामध्ये बहुवार्षिक फळबागा वाचविण्यासाठी लाभार्थींना मदत देताना मापदंड निश्चित केलेले आहे. यामध्ये फळबाग लाभार्थी निवड करताना शेतकऱ्यांच्या ७/१२ व ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१५ पर्यंत आहे.यामध्ये फळबागांचे पुनरुज्जीवन, पुर्नसंभार व्यवस्थापनसाठी प्रति हेक्टर ४० हजार प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के, जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे प्रती लाभार्थी २ हेक्टरपर्यंत, प्लॅस्टिक अच्छादनसाठी प्रति हेक्टरी ३२ हजार, प्रत्यक्ष खर्चाच्या ५०टक्के, जास्तीत जास्त १६ हजार रुपये प्रति लाभार्थी २ हेक्टरपर्यंत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन प्रति हेक्टर ४ हजार रुपये खर्चाच्या ३० टक्के जास्तीत जास्त १२०० रुपये प्रति हेक्टर प्रति लाभार्थी ४ हेक्टरच्या मर्यादेत असे मदतीचे स्वरुप आहे. पण तालुक्यात कमी लक्षांत दिल्याने उर्वरित शेतकऱ्यापूढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. कृषी विभागान मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)शासनाने फळबागाचे मोठे क्षेत्र असताना अत्यल्प क्षेत्राची निवड करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे अनेक फळबाग उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन जाब विचारावा. या विरूद्ध मोर्चा काढू- कल्याण सपाटे शासन हे व्यापाऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. शेतकऱ्यांना अनुदान देतांना मोठा अन्याय शेतकऱ्यांवर केला.- पंडीत धांडगे४दुष्काळी परिस्थिती मुळे आधीच शेतकरी आर्थीक अडचणीत असताना त्यांच्यावर अन्याय केला आहे. याविरूद्ध उपोषणास बसणार- बाळासाहेब बोरकर४दरम्यान सर्व शेतकऱ्यांना समान अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी बाळे पांढरे, रामेश्वर वाढेकर, विष्णू कोरडे, प्रकाश पसारे यांनी केली.