शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

सोने विकून जगविले कुटुंब !

By admin | Updated: December 21, 2014 00:09 IST

राम तत्तापूरे , अहमदपूर कुटुंबाची स्थिती मध्यम़ त्यामुळे महिला रोजंदाराच्या कामावर जाणे कुटुंबास मान्य नव्हते़ अशा परिस्थितीत घरातील सोने विकून आलेल्या पैशातून हायब्रीड,

राम तत्तापूरे , अहमदपूरकुटुंबाची स्थिती मध्यम़ त्यामुळे महिला रोजंदाराच्या कामावर जाणे कुटुंबास मान्य नव्हते़ अशा परिस्थितीत घरातील सोने विकून आलेल्या पैशातून हायब्रीड, सुकडी खरेदी करुन लेकरांना जगविले, अशी भावना अहमदपूर येथील महिला शेतकरी सुलोचना मल्लिकार्जून हामणे यांनी व्यक्त केली़१९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा मी ३८ वर्षांचे होते, असे सांगून सुलोचना हामणे म्हणाल्या, माझे कुटुंब मध्यम स्थितीचे होते़ कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती़ कुटुंबामध्ये पती, सासू- सासरे आणि चार लेकरं़ घरची संपूर्ण जबाबदारी आम्हा पती- पत्नीवर होती़ कुटुंबास १८ एकर शेती होती़ त्यातील १० एकर कोरडवाहू आणि १८ एकर माळरान जमीन होती़ या शेतीतून काळी ज्वारी, कापूस, तूर, साळ अशी पिके घेतली जात असे़ कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरु असताना १९७२ मध्ये दुष्काळ पडला आणि अन्न- धान्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली़ त्यावर्षी शेतीतूनही काही उत्पन्न आले नाही़ त्यामुळे घरातील मंडळींबरोबर लहान लेकरांना जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला़ महिला रोजंदारीने जाणे कुटुंबास मान्य नव्हते़ त्यामुळे या अडचणीवर मात करण्यासाठी घरात असलेले सर्व सोन्याचे दागिणे विकले़ विशेष म्हणजे त्याकाळी भावही तेवढा नव्हता़ त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे कुणाकडे पैसे नव्हते़ त्यामुळे अगदी कमी दराने सोने विक्री करावे लागले़ सोने विक्री करताना जीव तीळ- तीळ तुटत होता़ परंतु, लेकरांकडे पाहिले की, सोन्याची काय किंमत? असे वाटत असे़ सोने विक्रीतून आलेल्या पैशातून हायब्रीड खरेदी केले़ त्याचबरोबर पती कामावर जात असल्याने त्यांना सुकडी मिळत असे़ आम्ही पती- पत्नी एक- एक दिवस उपाशी राहून लेकरांचे पोट भरले आणि त्या दुष्काळावर मात केली़ विशेष म्हणजे, पशूधनाला वैरण ही चाकूर तालुक्यातील हटकरवाडी येथून आणावी लागत असे़ तसेच पिण्यासाठी लागणारे पाणी चार- पाच किमीवरुन आणावे लागत़ पाण्यासाठी विहिरीवर गर्दी असल्याने अनेकदा खरडूनही पाणी आणल्याचे त्या म्हणाल्या़