शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

निधी पाण्यात; जनता तहानलेलीच !

By admin | Updated: December 31, 2014 01:01 IST

संजय कुलकर्णी , जालना एकही गाव पाण्याविना राहू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकार वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्यासारखाच निधी खर्च करीत असताना

संजय कुलकर्णी , जालनाएकही गाव पाण्याविना राहू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकार वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्यासारखाच निधी खर्च करीत असताना जिल्हा पातळीवरील यंत्रणेतील काही जणांनी मात्र हा निधीच पाण्यात टाकला आहे. भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गतच्या ११८ आणि जलस्वराज्य कार्यक्रमाअंतर्गतच्या ३ अशा १२१ योजना गेल्या सात-आठ वर्षांपासून अपूर्णच आहेत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना तयार करण्यासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला. याच योजनेचे नाव पुढे जलस्वराज्य झाले आणि सध्या राष्ट्रीय पेयजल असे आहे. मात्र गेल्या आठ वर्षांतील योजनांची आकडेवारी प्रत्यक्षात झालेल्या योजना आणि अपूर्ण योजना याबाबत तफावत दर्शविणारी आहे. २००७-०८ ते २०१०-११ या तीन वर्षांच्या काळात १८० गावे, वाड्यांवर योजना राबविण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र आठ वर्षानंतरही यापैकी ११८ गावे, वाड्यांवरील योजना अपूर्ण आहेत. एकीकडे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेली गावे, वाड्यांची संख्या या विभागाने १८० दर्शविली आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेल्या योजनांपैकी पूर्ण करून अंतिम केलेली गावे, वाड्यांची संख्या ६२ दर्शविण्यात आली आहे. २००७-०८ मध्ये समितीच्या गाव अंतर्गत वादामुळे १२, उदभव अपुरा असल्याने ३, शासनस्तरावर सुधारित मान्यतेअभावी ५, विद्युत जोडणीअभावी १७, वितरण व्यवस्था अपूर्ण ३१, जलकुंभाचे काम अपूर्ण २८, लोकवर्गणी न भरल्यामुळे ५ आणि भौतिकदृष्ट्या पूर्ण, अंतिम करणे बाकी अशा १७ योजना अपूर्ण आहेत. तर जलस्वराज्य कार्यक्रमाअंतर्गत सोलगव्हाण, नेर व बामणी या तीन गावांमधील योजनांची कामे अपूर्ण आहेत.या योजनांची कामे तब्बल आठ वर्षांपासून अपूर्ण असण्यास प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप काही जि.प. सदस्यांनी यापूर्वीच केलेला आहे. उदभव अपूरा असेल तर दुसऱ्या विहिरी का दिसल्या नाहीत, विद्युत जोडणीचे काम अपूर्ण असेल तर पाठपुरावा का केला नाही, लोकवर्गणी भरली नाही मग कामांची देयके देण्याची घाई का झाली, असे विविध प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे या योजनांना वेळोवेळी मुदतवाढ कशी मिळाली, संबंधित एजन्सीकडून दंड का आकारला गेला नाही, हेही प्रश्न अनुत्तरीत आहेत.४जलस्वराज्य कार्यक्रमाअंतर्गत तीन कामांच्या प्रशासकीय मान्यता अपूर्ण आहेत. भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गतही अनेक योजना अपूर्ण आहेत. निधी देऊन, काही ठिकाणी कामे दाखवून निधीही अदा करण्यात आला. मात्र योजना सुरू होऊ शकली नाही. ४याप्रकरणी मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून तत्कालीन सदस्य व विद्यमान जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर व संभाजी उबाळे यांनी सभांमधून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावर प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही. एका गावात एक योजना अपूर्ण असल्याने तेथे दुसरी योजनाही राबविता येत नाही.