शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

सेतू सुविधा केंद्राचे कामकाज कोलमडले !

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

परंडा : सर्व्हर बंद पडल्यान मागील चार दिवसांपासून येथील सेतू सुविधा केंद्राचे संपूर्ण कामकाज कोलमडले आहे.

परंडा : सर्व्हर बंद पडल्यान मागील चार दिवसांपासून येथील सेतू सुविधा केंद्राचे संपूर्ण कामकाज कोलमडले आहे. तर दुसरीकडे सेतु केंद्रावर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालकांची एकच गर्दी उडाली आहे. केवळ अर्ज देण्यासाठी नागरिकांना एकेक तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांची ही फरफट महसूल विभागाचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. दहावी व बारावी परीक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. पुढील शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहेत. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयातून काढावी लागतात. यासाठी सेतू सुविधा केंद्रामध्ये अर्ज करावा लागतो. परंतु, या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी एकाच टेबलाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्यांना केवळ अर्ज देण्यासाठी एकेक दिवस खर्ची घालावा लागत आहे. दरम्यान, सातबारा, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी एक व जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एक अशा दोन टेबलांची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. एखाद्या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसांत संबंधित प्रमाणपत्र मिळत नाही. याचा फटकाही विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत, याचा फलकही सेतू केंद्राबाहेर लावण्यात आलेला नाही. तर अर्ज स्वीकारताना आवश्यक यादीपेक्षाही अधिक कागदपत्रे मागितली जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान, उपविभागीय पाठविल्या जात असलेल्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणत त्रुटी निघत असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाचा प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अर्जाचे नमुने तहसील परिसरातच चढ्या दराने विकून नागरिकांना लुबाडले जात आहे. नागरिकांच्या या हालअपेष्टांकडे लक्ष द्यायला महसूल अधिकाऱ्यांना सवड मिळणा कधी? असा प्रश्नही या निमित्ताने विद्यार्थी, पालकांतून उपस्थित केला जावू लागला आहे. (वार्ताहर)डेडलाईन केवळ नावालाच...सेतू केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर किमान १५ दिवसांत कोणतेही प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र, येथील सेतू केंद्रातून पावतीवरील तारीख उलटून गेल्यानतंरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे वेळ आणि पैसा नाहक र्खच होतो आहे. सध्या शेतकरी व विद्यार्थ्यांची या केंद्रावर जादा गर्दी दिसते. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपत एक-दोन महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ संतप्तचार दिवसांपासून सर्व्हर जॅम झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच अन्य ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत. सोमवारी तहसीलदार उपस्थित नसल्याने थेट नायब तहसीलदार पांडळे यांचे दालन गाठले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर तक्रारींचा पाऊस पाडला. कार्यालयातील मंडळी पाठीमागच्या दरवाजातून ‘खास’ मंडळीचे अर्ज स्वीकारतात, अशी तक्रारही केली. याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.परंडा शहरात सहा आणि ग्रामीण भागात सहा असे एकूण १२ महा-ई-सेवा केंद्र सुरू आहेत. या केंद्राद्वारेही कागदपत्रांसाठी अर्ज करता येताता. महा-ई-सेवा केंद्रधारक अगाऊ रक्कमेची आकारणी करीत असल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नायब तहसीलदार एस.एस. पाडळे यांनी सांगितले.