शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीच हवी

By admin | Updated: December 20, 2015 23:37 IST

परभणी : दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय असून शासनाने आर्थिक मदतीबरोबरच कर्जमाफीही द्यावी,

परभणी : दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच पर्याय असून शासनाने आर्थिक मदतीबरोबरच कर्जमाफीही द्यावी, असा सूर ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला. जिल्ह्यात पुरेसा पाऊस होत नसल्याने कृषी हंगाम हातचा गेला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे कुठलेही स्त्रोत उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शासनाकडे मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे आहे का? या मूळ प्रश्नाला घेऊन रविवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांची मते जाणून घेतली. जाहीर केलेले पॅकेज पुरेसे आहे का? या प्रश्नावर ७६ टक्के शेतकऱ्यांनी नकारात्मक उत्तर दिले तर १० टक्के शेतकऱ्यांना पॅकेज पुरेसे असल्याचे वाटते. १४ टक्के शेतकऱ्यांनी मात्र या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेतली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सर्वाधिक तरतूद कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी केली आहे. राज्यात सोयाबीन, कापूस उत्पादनाबरोबरच इतर पिकेही अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचेही दुष्काळाने नुकसान झाले आहे. त्यामुळे या संदर्भात शासनाचा हा निर्णय योग्य आहे का? असे विचारले असता ७६ टक्के शेतकऱ्यांनी नाही, असे उत्तर दिले. २० टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर ४ टक्के नागरिक सांगता येत नाही, असे उत्तर देऊन मोकळे झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्जमाफी हवी का? या प्रश्नावर मात्र ७६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर देत, कर्जमाफीला पाठिंबा दिला तर १४ टक्के नागरिकांना कर्जमाफी नको, असे वाटते. १० टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. दुष्काळग्रस्तांसाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत का? या प्रश्नावरही ७६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर देऊन शासनाची उदासीनता दाखवून दिली. १६ टक्के नागरिकांनी शासनाचे प्रयत्न होत आहेत, असे सांगितले. तर ८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेकांनी आपली मतेही मांडली. शासनाने योग्यवेळी योग्य पाऊल उचलून मदत द्यावी. शेतकऱ्यांबरोबरच गोरगरीब शेतकऱ्यांना मदत द्यावी. सरकार असंवेदनशील आहे. हातावर पोट भरणाऱ्यांची काळजी नाही, अशा संतप्त प्रतिक्रियाही मांडल्या. एकंदर शासनाने भरीव मदतीसाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी) मदतीसाठी शासनाची टाळाटाळ दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे का? या प्रश्नावर ८२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. १६ टक्के नागरिकांना टाळाटाळ होत नसल्याचे वाटते. तर २ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. एकंदर शासनाच्या धोरणांविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे. दुष्काळात जिल्हा होरपळत असून शासनाने मदतीसाठी तातडीने पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.