शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

औरंगाबादेत इंधन भेसळ : अहवाल नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा ...

ठळक मुद्देपुरवठा विभाग : सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकरणात इंधन भेसळीबाबत तपासणी करण्याचा फार्स पुरवठा विभागाने केला; परंतु त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही.क्रांतीचौकातील पेट्रोल पंपावर नोव्हेंबर २०१७ मध्ये पेट्रोलमध्ये पाणी आढळून आल्यामुळे दिवसभर पंपावर नागरिकांनी गदारोळ केला होता. पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे त्या दिवशीचा तणाव निवळला होता; परंतु तेथील इंधन तपासणीचे नमुने पुरवठा विभागाने घेतल्यानंतर त्याची पुढे काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे भेसळयुक्त इंधन विकणारे पेट्रोल पंपचालक मोकाट असून, त्यांना पुरवठा विभागाकडून आश्रय मिळतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा पुरवठा विभागाकडे मंगळवारी एका नागरिकाने पाणीमिश्रित इंधन खिंवसरापार्कमधील साईशरण पेट्रोलपंपातून मिळाल्याची तक्रार पुरवठा अधिकाºयांकडे पुराव्यानिशी केली; परंतु इंधन खरेदीचे बिल नसल्यामुळे त्या नागरिकाची तक्रार घेतली गेली नाही. गेल्या महिन्यात भाजप पदाधिकाºयाच्या चारचाकी वाहनात पाणीमिश्रित डिझेल भरल्याची तक्रार पुढे आली होती.पुरवठा अधिकारी म्हणालेपुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांना क्रांतीचौकातील पेट्रोल पंपाबाबत चौकशी अहवालाचे काय झाले, याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, तेथील इंधन भेसळीच्या नमुन्यांचा चौकशी अहवाल अजून आलेला नाही. दोन महिने उलटले तरी अहवाल का आला नाही. यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.आणखी एक तक्रारदरम्यान, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल आल्याची तक्रार एका ग्राहकाने बुधवारी केली.यासंदर्भात या ग्राहकाने सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनदरम्यान राज पेट्रोलपंप येथे दुचाकीत १ लिटर पेट्रोल भरले. मात्र, त्यानंतर घरी जाईपर्यंत गाडी अनेकदा बंद पडत होती. बुधवारी सकाळी गाडी चालू करून थोडे अंतर पुढे गेल्यावर बंद पडत होती. अखेर मेकॅनिककडे गाडी नेली. त्यांनी गाडीच्या टाकीतील सर्व पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरले असता. त्यात ७० टक्के पाणी तर ३० टक्के पेट्रोल तरंगत असल्याचे आढळून आले. ती बाटली घेऊन मी राज पेट्रोलपंपवर गेलो तेव्हा तेथील व्यवस्थापक युसूफभाई उडवाउडवीचे उत्तर देऊन निघून गेले. मात्र, मी पुन्हा सायंकाळी पेट्रोलपंपवर तीच बाटली घेऊन गेलो तेव्हा त्यांनी इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये पाणी होत असल्याचे कारण सांगितले.यासंदर्भात युसूफभाई यांना विचारणा केली असता पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर आम्ही आमच्या सर्व पंपांवरील पेट्रोलची तपासणी केली. मात्र, तसे आढळून आले नाही.कंपनीच्या विक्री व्यवस्थापिका अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले की, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलला पाण्याचा स्पर्श झाला की इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. इथेनॉलचे पाणी होते, पेट्रोल टाकीत पाणी झाले की, बाईक सुरूकरण्यास त्रास होतो. यासंदर्भात आज पेट्रोलपंपचालकांची बैठक घेण्यात आली.जालना रोडवरील राज पेट्रोल पंपावर ग्राहकाने तक्रार करताना दाखविलेली हीच ती बाटली. दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढले असता त्यात पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचे आढळून आले. पाणी खाली त्यावर पेट्रोल तरंगत होते. तसेच पेट्रोलपंप व्यवस्थापकाने काचेच्या परीक्षण नळीत अगोदर पाणी टाकले व त्यावर पेट्रोल टाकले. हळूहळू पेट्रोलचे रूपांतर पाण्यात होईल, असे हा व्यवस्थापक म्हणाला.पेट्रोलपंपचालकांची जनजागृती मोहीमपेट्रोलपंप संघटनेचे अकील अब्बास यांनी सांगितले की, इंधन कंपन्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीसाठी आणत आहेत. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल टाकले जात असे आता १० टक्के इथेनॉल टाकले जाते. पेट्रोलपंपचालक इंधनात पाण्याची भेसळ करीत असल्याच्या तक्रारी चुकीच्या आहेत. यासंदर्भात आम्ही जनजागृती मोहीम हाती घेत आहोत.