शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

औरंगाबादेत इंधन भेसळ : अहवाल नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा ...

ठळक मुद्देपुरवठा विभाग : सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकरणात इंधन भेसळीबाबत तपासणी करण्याचा फार्स पुरवठा विभागाने केला; परंतु त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही.क्रांतीचौकातील पेट्रोल पंपावर नोव्हेंबर २०१७ मध्ये पेट्रोलमध्ये पाणी आढळून आल्यामुळे दिवसभर पंपावर नागरिकांनी गदारोळ केला होता. पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे त्या दिवशीचा तणाव निवळला होता; परंतु तेथील इंधन तपासणीचे नमुने पुरवठा विभागाने घेतल्यानंतर त्याची पुढे काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे भेसळयुक्त इंधन विकणारे पेट्रोल पंपचालक मोकाट असून, त्यांना पुरवठा विभागाकडून आश्रय मिळतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा पुरवठा विभागाकडे मंगळवारी एका नागरिकाने पाणीमिश्रित इंधन खिंवसरापार्कमधील साईशरण पेट्रोलपंपातून मिळाल्याची तक्रार पुरवठा अधिकाºयांकडे पुराव्यानिशी केली; परंतु इंधन खरेदीचे बिल नसल्यामुळे त्या नागरिकाची तक्रार घेतली गेली नाही. गेल्या महिन्यात भाजप पदाधिकाºयाच्या चारचाकी वाहनात पाणीमिश्रित डिझेल भरल्याची तक्रार पुढे आली होती.पुरवठा अधिकारी म्हणालेपुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांना क्रांतीचौकातील पेट्रोल पंपाबाबत चौकशी अहवालाचे काय झाले, याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, तेथील इंधन भेसळीच्या नमुन्यांचा चौकशी अहवाल अजून आलेला नाही. दोन महिने उलटले तरी अहवाल का आला नाही. यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.आणखी एक तक्रारदरम्यान, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल आल्याची तक्रार एका ग्राहकाने बुधवारी केली.यासंदर्भात या ग्राहकाने सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनदरम्यान राज पेट्रोलपंप येथे दुचाकीत १ लिटर पेट्रोल भरले. मात्र, त्यानंतर घरी जाईपर्यंत गाडी अनेकदा बंद पडत होती. बुधवारी सकाळी गाडी चालू करून थोडे अंतर पुढे गेल्यावर बंद पडत होती. अखेर मेकॅनिककडे गाडी नेली. त्यांनी गाडीच्या टाकीतील सर्व पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरले असता. त्यात ७० टक्के पाणी तर ३० टक्के पेट्रोल तरंगत असल्याचे आढळून आले. ती बाटली घेऊन मी राज पेट्रोलपंपवर गेलो तेव्हा तेथील व्यवस्थापक युसूफभाई उडवाउडवीचे उत्तर देऊन निघून गेले. मात्र, मी पुन्हा सायंकाळी पेट्रोलपंपवर तीच बाटली घेऊन गेलो तेव्हा त्यांनी इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये पाणी होत असल्याचे कारण सांगितले.यासंदर्भात युसूफभाई यांना विचारणा केली असता पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर आम्ही आमच्या सर्व पंपांवरील पेट्रोलची तपासणी केली. मात्र, तसे आढळून आले नाही.कंपनीच्या विक्री व्यवस्थापिका अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले की, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलला पाण्याचा स्पर्श झाला की इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. इथेनॉलचे पाणी होते, पेट्रोल टाकीत पाणी झाले की, बाईक सुरूकरण्यास त्रास होतो. यासंदर्भात आज पेट्रोलपंपचालकांची बैठक घेण्यात आली.जालना रोडवरील राज पेट्रोल पंपावर ग्राहकाने तक्रार करताना दाखविलेली हीच ती बाटली. दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढले असता त्यात पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचे आढळून आले. पाणी खाली त्यावर पेट्रोल तरंगत होते. तसेच पेट्रोलपंप व्यवस्थापकाने काचेच्या परीक्षण नळीत अगोदर पाणी टाकले व त्यावर पेट्रोल टाकले. हळूहळू पेट्रोलचे रूपांतर पाण्यात होईल, असे हा व्यवस्थापक म्हणाला.पेट्रोलपंपचालकांची जनजागृती मोहीमपेट्रोलपंप संघटनेचे अकील अब्बास यांनी सांगितले की, इंधन कंपन्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीसाठी आणत आहेत. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल टाकले जात असे आता १० टक्के इथेनॉल टाकले जाते. पेट्रोलपंपचालक इंधनात पाण्याची भेसळ करीत असल्याच्या तक्रारी चुकीच्या आहेत. यासंदर्भात आम्ही जनजागृती मोहीम हाती घेत आहोत.