शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

औरंगाबादेत इंधन भेसळ : अहवाल नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा ...

ठळक मुद्देपुरवठा विभाग : सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकरणात इंधन भेसळीबाबत तपासणी करण्याचा फार्स पुरवठा विभागाने केला; परंतु त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही.क्रांतीचौकातील पेट्रोल पंपावर नोव्हेंबर २०१७ मध्ये पेट्रोलमध्ये पाणी आढळून आल्यामुळे दिवसभर पंपावर नागरिकांनी गदारोळ केला होता. पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीमुळे त्या दिवशीचा तणाव निवळला होता; परंतु तेथील इंधन तपासणीचे नमुने पुरवठा विभागाने घेतल्यानंतर त्याची पुढे काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे भेसळयुक्त इंधन विकणारे पेट्रोल पंपचालक मोकाट असून, त्यांना पुरवठा विभागाकडून आश्रय मिळतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा पुरवठा विभागाकडे मंगळवारी एका नागरिकाने पाणीमिश्रित इंधन खिंवसरापार्कमधील साईशरण पेट्रोलपंपातून मिळाल्याची तक्रार पुरवठा अधिकाºयांकडे पुराव्यानिशी केली; परंतु इंधन खरेदीचे बिल नसल्यामुळे त्या नागरिकाची तक्रार घेतली गेली नाही. गेल्या महिन्यात भाजप पदाधिकाºयाच्या चारचाकी वाहनात पाणीमिश्रित डिझेल भरल्याची तक्रार पुढे आली होती.पुरवठा अधिकारी म्हणालेपुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांना क्रांतीचौकातील पेट्रोल पंपाबाबत चौकशी अहवालाचे काय झाले, याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, तेथील इंधन भेसळीच्या नमुन्यांचा चौकशी अहवाल अजून आलेला नाही. दोन महिने उलटले तरी अहवाल का आला नाही. यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.आणखी एक तक्रारदरम्यान, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल आल्याची तक्रार एका ग्राहकाने बुधवारी केली.यासंदर्भात या ग्राहकाने सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनदरम्यान राज पेट्रोलपंप येथे दुचाकीत १ लिटर पेट्रोल भरले. मात्र, त्यानंतर घरी जाईपर्यंत गाडी अनेकदा बंद पडत होती. बुधवारी सकाळी गाडी चालू करून थोडे अंतर पुढे गेल्यावर बंद पडत होती. अखेर मेकॅनिककडे गाडी नेली. त्यांनी गाडीच्या टाकीतील सर्व पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत भरले असता. त्यात ७० टक्के पाणी तर ३० टक्के पेट्रोल तरंगत असल्याचे आढळून आले. ती बाटली घेऊन मी राज पेट्रोलपंपवर गेलो तेव्हा तेथील व्यवस्थापक युसूफभाई उडवाउडवीचे उत्तर देऊन निघून गेले. मात्र, मी पुन्हा सायंकाळी पेट्रोलपंपवर तीच बाटली घेऊन गेलो तेव्हा त्यांनी इथेनॉलमुळे पेट्रोलमध्ये पाणी होत असल्याचे कारण सांगितले.यासंदर्भात युसूफभाई यांना विचारणा केली असता पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर आम्ही आमच्या सर्व पंपांवरील पेट्रोलची तपासणी केली. मात्र, तसे आढळून आले नाही.कंपनीच्या विक्री व्यवस्थापिका अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले की, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलला पाण्याचा स्पर्श झाला की इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. इथेनॉलचे पाणी होते, पेट्रोल टाकीत पाणी झाले की, बाईक सुरूकरण्यास त्रास होतो. यासंदर्भात आज पेट्रोलपंपचालकांची बैठक घेण्यात आली.जालना रोडवरील राज पेट्रोल पंपावर ग्राहकाने तक्रार करताना दाखविलेली हीच ती बाटली. दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढले असता त्यात पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचे आढळून आले. पाणी खाली त्यावर पेट्रोल तरंगत होते. तसेच पेट्रोलपंप व्यवस्थापकाने काचेच्या परीक्षण नळीत अगोदर पाणी टाकले व त्यावर पेट्रोल टाकले. हळूहळू पेट्रोलचे रूपांतर पाण्यात होईल, असे हा व्यवस्थापक म्हणाला.पेट्रोलपंपचालकांची जनजागृती मोहीमपेट्रोलपंप संघटनेचे अकील अब्बास यांनी सांगितले की, इंधन कंपन्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीसाठी आणत आहेत. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल टाकले जात असे आता १० टक्के इथेनॉल टाकले जाते. पेट्रोलपंपचालक इंधनात पाण्याची भेसळ करीत असल्याच्या तक्रारी चुकीच्या आहेत. यासंदर्भात आम्ही जनजागृती मोहीम हाती घेत आहोत.