शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

मित्रपक्षांनीच उठवला रिपाइंचा फायदा

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला.

उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहिलो. पक्षाची राज्यात सत्ता आली. आमची मते मित्रपक्षांना जातात, मात्र मित्रपक्षांचा फायदा आम्हाला होत नसल्याची खंत खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. शुक्रवारी आठवले यांनी तुळजापूर येथे रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य सरचिटणीस राजा सरवदे, राज्य चिटणीस संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनाच आम्ही प्रामाणिकपणे मतदानही केले. मात्र, मित्रपक्षांची मते त्या तुलनेत आम्हाला मिळाली नसल्याची खंत व्यक्त करीत पुण्यातील चंद्रकांता सोनकांबळे तसेच इतर काही जागांवर रिपाइं उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले आहेत. भाजपाकडून थोडीशी रसद मिळाली असती तर येथे विजय मिळाला असता, असेही ते म्हणाले. येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात आश्वासन दिल्याप्रमाणे रिपाइंला दहा टक्के वाटा मिळेल, अशी आशा असल्याचे सांगून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपाकडून सन्मानाची वागणूक अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येत्या २८ रोजी मुंबई येथे पक्षाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत असून, नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करावा. तेथील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना पुरेसे संरक्षण पुरवावे, नगर जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या बरखास्त कराव्यात, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जिल्ह्यात होत असलेले अत्याचाराचे प्रकार घृणास्पद असल्याचे सांगत जवखेड्यातील घटनेनंतर जामखेड येथे कैैकाडी समाजातील बाळू माने याची हत्या झाली आहे. सदर अत्याचार थांबविण्यासाठी गृह विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली. बैठकीला जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, विद्यानंद बनसोडे, भालचंद्र कठारे, रणजीत मस्के, किशोर वाघमारे, मंगेश सुकाळे, शहाजी सोनवणे, विनायक वाघमारे, सिध्दार्थ शिंदे, आकाश बनसोडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)