शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मित्रपक्षांनीच उठवला रिपाइंचा फायदा

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला.

उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहिलो. पक्षाची राज्यात सत्ता आली. आमची मते मित्रपक्षांना जातात, मात्र मित्रपक्षांचा फायदा आम्हाला होत नसल्याची खंत खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. शुक्रवारी आठवले यांनी तुळजापूर येथे रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य सरचिटणीस राजा सरवदे, राज्य चिटणीस संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनाच आम्ही प्रामाणिकपणे मतदानही केले. मात्र, मित्रपक्षांची मते त्या तुलनेत आम्हाला मिळाली नसल्याची खंत व्यक्त करीत पुण्यातील चंद्रकांता सोनकांबळे तसेच इतर काही जागांवर रिपाइं उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले आहेत. भाजपाकडून थोडीशी रसद मिळाली असती तर येथे विजय मिळाला असता, असेही ते म्हणाले. येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात आश्वासन दिल्याप्रमाणे रिपाइंला दहा टक्के वाटा मिळेल, अशी आशा असल्याचे सांगून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपाकडून सन्मानाची वागणूक अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येत्या २८ रोजी मुंबई येथे पक्षाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत असून, नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करावा. तेथील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना पुरेसे संरक्षण पुरवावे, नगर जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या बरखास्त कराव्यात, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जिल्ह्यात होत असलेले अत्याचाराचे प्रकार घृणास्पद असल्याचे सांगत जवखेड्यातील घटनेनंतर जामखेड येथे कैैकाडी समाजातील बाळू माने याची हत्या झाली आहे. सदर अत्याचार थांबविण्यासाठी गृह विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली. बैठकीला जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, विद्यानंद बनसोडे, भालचंद्र कठारे, रणजीत मस्के, किशोर वाघमारे, मंगेश सुकाळे, शहाजी सोनवणे, विनायक वाघमारे, सिध्दार्थ शिंदे, आकाश बनसोडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)