शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

शेततळ्यावर जोपासताहेत चार एकर शेवगा !

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

भूूम : मागील दोन-तीन वर्षांपासून वालवड सर्कलमध्ये सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम आहे.

भूूम : मागील दोन-तीन वर्षांपासून वालवड सर्कलमध्ये सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम आहे. त्यामुळे सध्या एकट्या वालवड येथे तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा या दुष्काळी स्थितीला दुषणे न देता याच सर्कलमधील राळेसांगवी येथील शेतकऱ्याने सुमारे दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आहे. आज त्याच पाण्यावर थोड्याथोडक्या नव्हे, तर चार एकरांवरील शेवगा जोपासला जात आहे. अत्यल्प पावसामुळे गतवर्षी भूम तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खालावली होती. यंदाही सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे वालवड सर्कलमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद आहे. त्यामुळेच की काय, एकट्या वालवड गावाची तीन टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. अत्यल्प पावसामुळे आणि सिंचनाची शाश्वत सुविधा नसल्याने शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी शेतीच्या उत्पन्नमध्ये कमालीची घट झाली आहे. असे असतानाच याच सर्कलमधील राळेसांगवी येथील शेतकरी भरतरी टाळके यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन या योजनेतून शेततळे बांधले आहे. यासाठी सुमारे सात लाख रूपये खर्च झाले असून या तळ्याची क्षमता २ कोटी १६ लाख लिटर इतकी आहे.दरम्यान, शेतकरी टाळके यांनी या शेततळ्याच्या पाण्यावर सुमारे चार एकरावर शेवग्याची लागवड केली आहे. ठिबक सिंचनच्या माध्यमातून शेवग्याला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शेवग्याची वाढही अपेक्षेप्रमाणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून किमान अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, असेही ते म्हणाले. अत्यल्प पावसामुळे न डगमगता, टाकळे यांनी एकप्रकारे या भागातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)