शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेततळ्यावर जोपासताहेत चार एकर शेवगा !

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

भूूम : मागील दोन-तीन वर्षांपासून वालवड सर्कलमध्ये सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम आहे.

भूूम : मागील दोन-तीन वर्षांपासून वालवड सर्कलमध्ये सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम आहे. त्यामुळे सध्या एकट्या वालवड येथे तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा या दुष्काळी स्थितीला दुषणे न देता याच सर्कलमधील राळेसांगवी येथील शेतकऱ्याने सुमारे दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आहे. आज त्याच पाण्यावर थोड्याथोडक्या नव्हे, तर चार एकरांवरील शेवगा जोपासला जात आहे. अत्यल्प पावसामुळे गतवर्षी भूम तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खालावली होती. यंदाही सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे वालवड सर्कलमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद आहे. त्यामुळेच की काय, एकट्या वालवड गावाची तीन टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. अत्यल्प पावसामुळे आणि सिंचनाची शाश्वत सुविधा नसल्याने शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी शेतीच्या उत्पन्नमध्ये कमालीची घट झाली आहे. असे असतानाच याच सर्कलमधील राळेसांगवी येथील शेतकरी भरतरी टाळके यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन या योजनेतून शेततळे बांधले आहे. यासाठी सुमारे सात लाख रूपये खर्च झाले असून या तळ्याची क्षमता २ कोटी १६ लाख लिटर इतकी आहे.दरम्यान, शेतकरी टाळके यांनी या शेततळ्याच्या पाण्यावर सुमारे चार एकरावर शेवग्याची लागवड केली आहे. ठिबक सिंचनच्या माध्यमातून शेवग्याला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शेवग्याची वाढही अपेक्षेप्रमाणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून किमान अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, असेही ते म्हणाले. अत्यल्प पावसामुळे न डगमगता, टाकळे यांनी एकप्रकारे या भागातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)